शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

राहुल गांधींच्या टीममध्ये निर्णय घेणारा 'तो' बॉडीगार्ड कोण?; आझादांनी केला होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 21:15 IST

गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा पत्रात उल्लेख केलेला सुरक्षा रक्षक कोण आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी तब्बल पाच दशकांनंतर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसशी संबंध तोडण्यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केलेत. देशातील सर्वात जुना पक्ष आता "पूर्णपणे नष्ट" झाला आहे असा दावा त्यांनी केला. पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व अंतर्गत निवडणुकांच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचा आरोप आझाद यांनी केला. 

त्याचसोबत पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश वर्तनाचा आरोपही त्यांनी केला. आझाद म्हणाले की, आता सोनिया गांधी या केवळ नाममात्र नेत्या आहेत कारण राहुल गांधींचे सुरक्षा रक्षक आणि पीए हे निर्णय घेतात. गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा पत्रात उल्लेख केलेला सुरक्षा रक्षक कोण आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याशिवाय गुलाम नबी आझाद यांनी राहुल यांच्या वर्तुळातील नेत्यांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. गेल्या आठ वर्षांत नेतृत्वाने गंभीर नसलेल्या व्यक्तीला पक्षावर लादण्याचा प्रयत्न केल्यामुळेच हे सर्व घडल्याचा आरोप आझाद यांनी केला. काँग्रेस गुंडांच्या आश्रयाने चालवली जात आहे. आझाद यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत ते राहुल मंडळीतील कोण आहेत? हे जाणून घेऊया. 

राहुलच्या सुरक्षेची जबाबदारी बायजूकडेहिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या राजीनाम्यात सुरक्षा रक्षकाचा उल्लेख केला आहे, ती व्यक्ती केबी बायजू असावी. रिपोर्टनुसार, बायजू हे आधी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचा भाग होते. राहुल गांधी पक्षात सरचिटणीस बनल्यानंतर ते सक्रीय झाले. बायजू यांनी काँग्रेसमध्ये कोणतेही औपचारिक पद भूषवले नाही, परंतु पक्षातील त्यांचा दर्जा वाढतच गेला. बायजू राहुल गांधींच्या सुरक्षेशिवाय महत्त्वाच्या कामाची जबाबदारी घेतात. यामध्ये राहुल गांधी यांच्या या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या गोवा दौऱ्याचा समावेश आहे. आता ही व्यक्ती भारत जोडो यात्रेचाही महत्त्वाचा भाग आहे. काँग्रेस नेत्यांनुसार, बायजू राहुल गांधींचा प्रवास सांभाळत असल्याने ते बऱ्यापैकी शक्तिशाली झाले आहेत. कोणत्या व्यक्तीने राहुल गांधींसोबत किती वेळ घालवायचा हे बायजूच ठरवतात. एवढेच नाही तर ते राहुल गांधींसोबत स्टेजही शेअर करतात. 

'टीम राहुल'मधील वेणुगोपालांवरही अप्रत्यक्ष निशाणाआझाद यांनी राजीनामा पत्रात राहुल गांधींच्या भोवताळील चौकडीचा उल्लेख केला आहे. यात अप्रत्यक्षपणे केसी वेणुगोपाल यांना लक्ष्य करण्यात आलं. केसी वेणुगोपाल हे राहुल गांधींसाठी खूप खास आहेत. २०१७ मध्ये वेणुगोपाल यांची सरचिटणीस पदावर बढती करण्यात आली. त्याच वर्षी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षही झाले. वेणुगोपाल यांच्यापर्यंत पोहोचणे खूप कठीण असा समज नेत्यांमध्ये होता. त्यामुळे आझाद यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असायचे. ज्याप्रकारे गुलाम नबी आझाद, संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या जवळचे होते. तसेच राहुल यांच्या टीममधील लोकांना त्यांच्या नेत्यांवर विश्वास आहे. राहुल गांधींच्या टीममध्ये रणदीप सिंग सुरजेवाला आणि अजय माकन यांचाही समावेश आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी