शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"हिंदुत्वाची तुलना ISIS आणि जिहादी इस्लामशी करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 09:48 IST

Congress Ghulam Nabi Azad And Salman Khurshid : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकातील हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आपण सहमत नसल्याचं म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - काँग्रेस नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या Sunrise Over Ayodhya या पुस्तकामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्ववादी संघटनांची तुलना थेट दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरमसोबत केली आहे. बुधवारी खुर्शीद यांचे हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर 24 तासांच्या आत दिल्लीच्या पोलीस ठाण्यात पुस्तकाविरोधात गुन्हा नोंद झाला. या पुस्तकाच्या वादावरुन शिवसेनेनेही सलमान खुर्शीद यांना फटकारलं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Congress Ghulam Nabi Azad) यांनी माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकातील हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आपण सहमत नसल्याचं म्हटलं आहे. 

"हिंदुत्वाची तुलना ISIS शी केली जाऊ शकते, हे चुकीचे आहे आणि अतिशयोक्ती आहे" असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. आझाद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खुर्शीद यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत एक ट्विट केलं आहे. "हिंदू धर्माच्या मिश्र संस्कृतीपासून वेगळे असलेली राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्वाशी आम्ही असहमत असलो, तरी ISIS आणि जिहादी इस्लामशी हिंदुत्वाची तुलना करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे" असं म्हटलं आहे. आझाद हे काँग्रेसच्या G23 गटाचे प्रमुख नेते आहेत. 

सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्व काय आहे ते समजून घ्यावं. हिंदुत्ववादी संघटनांची कामं काय आहेत ज्याची तुलना थेट ISIS ची करावी लागली. ISISI ची तुलना करावी हे निंदनीय आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी जगभरात कुठेही बॉम्बस्फोट घडवले नाहीत. त्यामुळे खुर्शीद यांनी जी मुक्ताफळं उधळली आहेत. त्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.

या प्रकरणात विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न सलमान खुर्शीद यांनी केला आहे. त्याचसोबत भाजपाने या पुस्तकावरुन सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ही भूमिका केवळ सलमान खुर्शीद यांचीच नव्हे तर काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. देशात बहुसंख्याक असलेल्या समाजाच्या भावना दुखावण्यासाठीच हे विधान केलं असावं हे यातून स्पष्ट होते. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरुनच हे वारंवार केले जाते असा आरोप भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे.

सलमान खुर्शीद यांनी पुस्तकात काय म्हटलंय?

या वादग्रस्त पुस्कात सलमान खुर्शीद म्हणतात की, हिंदुत्व सनातन, साधू-संत आणि प्राचीन हिंदू धर्म बाजूला ठेवत आहे, जे प्रत्येक प्रकारे ISIS आणि बोको हराम सारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखं आहे. हिंदुत्वाचं राजकारण करणारे चुकीचे लोक आहे आणि ISIS ही वाईट आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदcongressकाँग्रेसPoliticsराजकारण