शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' हवी, पण काही लोकांना वाटतं...; कपिल सिब्बल यांचा गांधी कुटुंबावर मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:25 IST

"ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार."

 नवी दिल्ली - पाच राज्यांत झालेला दारुण पराभव, नेतृत्व बदलाची मागणी, काँग्रेसमधून (Congress) होणारे नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पलायन, अशा अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसचे जुने अथवा वरिष्ठ नेते चितीत दिसत आहेत. काँग्रेसची ही घसरण पाहता, पक्षातील वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal), यांनी नेतृत्व बदलासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेसमध्ये सुधारणांची मागणी करणाऱ्या ग्रुप 23 मधील नेत्यांमध्ये कपिल सिब्बल हे, असे पहिले नेते आहेत, ज्यांनी सोनिया गांधी यांना उघडपणे पद सोडण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही, तर आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडावा आणि कुण्या दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले, पक्षाचे नेतृत्व कोकीळेच्या धरतीवर (अर्थात सर्व काही ठीक आहे, असे वाटणे, पण वास्तविकतेशी संबंध नसणे.) जगत आहे. 8 वर्षांपासून पक्षाची सातत्याने घसरण होत असतानाही ते जागे होत नाहीत. ही काँग्रेससाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

मला सर्वांची काँग्रेस हवी आहे, कुणाच्या घरची काँग्रेस नाको -सिब्बल म्हणाले, काही लोक काँग्रेसच्या आतील आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेरील आहेत. पण खऱ्या आणि सर्वांच्या काँग्रेससाठी, काँग्रेस बाहेरील लोकांचेही ऐकायला हवे. ते म्हणाले, ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार.

सिब्बल म्हणाले, ‘सर्वांची काँग्रेस म्हणजे, केवळ सोबत असणेच नाही, तर भारतातील ज्या लोकांना भाजप नको आहे, अशा सर्व लोकांना एकत्रित आणणे आहे. याशिवाय, ‘ममता बॅनर्जी असतील, शरद पवार असतील, हे सर्व जन काँग्रेसचेच होते. मात्र, सर्व जण दूर गेले आहेत. या सर्वांना एकत्रित आणायचे आहे,’ असेही सिब्बल म्हणाले.

कपिल सिब्बल म्हणाले, "दुर्दैवाची गोष्ट आहे, की काही एबीसी लोकांना वाटते, की घरच्या काँग्रेसशिवाय सर्वांची काँग्रेस चालूच शकत नाही. आपल्यासाठी हेच आव्हान आहे. मी कुण्याही एबीसीविरोधात नाही. मात्र, आपल्याला हे आव्हान स्विकारावे लागेल," असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी