शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:23 IST

Gangotri Glacier: आयआयटी इंदूरने गंगोत्री ग्लेशियरबद्दल केलेल्या एका अभ्यासातून चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत. बर्फ वितळून गंगेच्या पात्रात येणारे पाणी कमी होत चाललं असल्याचे यात म्हटले गेले आहे. 

गंगेच्या मुख्य स्त्रोत असलेल्या गंगोत्री हिमनदीबद्दल चिंता वाढवणारी बाब एका संशोधनात दिसून आली आहे. गंगोत्री ग्लेशियर मागील ४० वर्षांत १० टक्क्यांनी वितळले असून, हे पर्यावरण बदलामुळे होत आहे. आयआयटी इंदूर आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या नव्या अभ्यासात हे आढळून आले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आयआयटी इंदूरच्या ग्लेशी हायड्रो-क्लायमेट संशोधन केंद्राचे पारूल विंजे यांच्या नेतृत्वाखाली टीमने हा अभ्यास केला. जर्नल ऑफ इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंगमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. 

या अभ्यासात अमेरिकेतील चार विद्यापीठातील आणि नेपाळच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटेन डेव्हलपमेंटचे शास्त्रज्ञ यात सहभागी झाले होते. उपग्रह आणि वस्तुनिष्ठ आकडेवारीचा वापर करून गंगोत्री ग्लेशियर सिस्टिमचे विश्लेषण केले गेले. 

गंगोत्री ग्लेशियरमध्ये कोणते बदल होत आहेत?

मागील ४० वर्षात गंगोत्रीच्या एकूण प्रवाही पाण्यात बर्फ वितळून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. बर्फ वितळून गंगेत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण ६४ टक्के आहे. पण, बर्फ वितळून पात्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण १९८०-९० मध्ये ७३ टक्के होते. ते कमी होऊन २०१०-२० मध्ये ६३ टक्क्यांवर आले आहे. 

२०००-२०१० मध्ये बर्फ वितळून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण ५२ टक्क्यांवर गेले होते. ते २०१०-२० मध्ये वाढून ६३ टक्के झाले आहे. २००१-२०२० या काळात गंगोत्रीच्या क्षेत्रातील तापमान १९८०-२००० या तुलनेत ०.५ अंश सेल्सिअस इतके वाढले. त्यामुळे उन्हाळ्यात बर्फ वितळण्यास सुरूवात होते, आता हे ऑगस्ट ते जुलै दरम्यान बदलले आहे. 

जागतिक पातळीवर होत असलेल्या पर्यावरण बदलांचा परिणाम गंगोत्री ग्लेशियर होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात होणारी हिमवृष्टी कमी होत आहे. तापमान वाढल्यामुळे बर्फाचा स्तर कमी बनू लागला आहे. त्यामुळे बर्फ वितळून येणारे पाणी कमी झाले आहे. 

गंगोत्री ग्लेशियर उत्तर भारतात पाण्याचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. कारण या भागातून गंगा वाहते आणि गंगेत पाणी गंगोत्री हिमनदीतून येते. बर्फ वितळून येणारे पाणी कमी होत असून, पावसावर अवलंबित्व वाढल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. गंगेच्या खोऱ्यात लाखो लोक शेती करतात, त्यावर परिणाम होईल. 

टॅग्स :riverनदीscienceविज्ञानTemperatureतापमानweatherहवामान अंदाज