शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 14:12 IST

निवृत्त लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आपल्या आत्मचरित्रात गलवानमध्ये झालेल्या चीन सैन्यासोबतच्या तणावाचा उल्लेख केला आहे.

गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये भारत आणि चीन सैन्यात मोठी चकमक झाली होती. ही ४० वर्षांतील सर्वात प्राणघातक चकमक मानली जाते. यावरुन देशात आरोप-प्रत्यारोपही झाले होते, यावर आता तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी मोठा खुलासा केला आहे. 

तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. पूर्व लडाखमधील एलएसीवर चिनी सैन्याने रणगाडे घेऊन पुढे जाण्यास सुरुवात केली होती. गलवान खोऱ्यातील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने भारतीय लष्कराला फ्री हॅन्ड दिला होता, आणि जे योग्य असेल ते करण्याचे आदेश दिले होते. जनरल एम एम नरवणे यांनी या परिस्थितीचा कसा सामना केला हे त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.

निवृत्त लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आत्मचरित्रात ३१ ऑगस्ट २०२० च्या रात्रीचा उल्लेख केला आहे. नरवणेंसाठी ती रात्र सोपी नव्हती, त्या रात्री त्यांना संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संरक्षण कर्मचारी यांचे सतत फोन येत होते, यामुळे त्यांच्या अडचणी आणखी काही वाढल्या.

नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, "त्या रात्री मी पहिल्यांदा संरक्षणमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास मला फोन आला. संरक्षणमंत्र्यांनी मला फोन केला. म्हणाले, मी पंतप्रधानांशी बोललो आहे आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असे त्यांनी सांगितले. हा लष्करी निर्णय होता.

आपल्या आत्मचरित्रात पुढे माजी लष्करप्रमुख  म्हणाले, "मला अतिशय नाजूक परिस्थितीत टाकण्यात आले होते, जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर होती. मी खोलीत काही वेळ फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू शकलो आणि मी शांतपणे बसलो. मग एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केले.

सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिल्यानंतर त्यांनी नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय के जोशी यांना फोन केला" मी त्यांना फोन केला आणि आमच्या बाजूने पहिला गोळीबार होऊ शकत नाही, कारण यामुळे चिनी सैन्याला एक निमित्त मिळेल आणि ते पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक होतील.", असं त्यांना सांगितलं.

भारतीय लष्कर स्वतः कैलास पर्वतरांगांवर मजबूत स्थितीत

नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, चिनी लष्कराने २९-३० ऑगस्टच्या रात्री मोल्डो येथून पॅंगॉन्ग त्सो येथील चुनती चांगला भागात आपले सैन्य पाठवले होते. तथापि, ३० तारखेच्या सकाळपर्यंत भारतीय लष्कर स्वतः कैलास पर्वतरांगांवर अतिशय मजबूत स्थितीत होते.

चीनी सैन्याचे स्थान खूप कमी उंचीवर होते, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकलो. "सध्या त्यांचा आमच्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता, परंतु जर ते मोठ्या लष्करी क्षमतेसह आले असते, तर आमच्यासाठी नवीन आव्हान उभे राहू शकले असते." ३१ ऑगस्ट रोजी चीनच्या बाजूने बरीच हालचाल दिसली होती, पण भारतीय सैन्याने आपली स्थिती बरीच मजबूत केली होती, असंही त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.

संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचे सतत फोन

माजी लष्करप्रमुखांनी लिहिले की, "पुन्हा एकदा नॉर्दर्न कमांडच्या आर्मी चीफचा फोन आला. त्यांनी माहिती दिली की चिनी रणगाडे पुढे सरसावत आहेत आणि माथ्यापासून फक्त एक किलोमीटर दूर आहेत. मी पुन्हा संरक्षणमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना विचारले की काय करावे?"

नरवणे म्हणाले की, त्यांनी पुन्हा एकदा संरक्षण मंत्री आणि NSA अजित डोवाल यांना रात्री १० वाजता फोन केला आणि कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर मला लगेच कमांडर जोशी यांचा फोन आला. टँक पुढे सरकल्या असून आता फक्त ५०० मीटर अंतर उरल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जोशी यांनी नरवणे यांना सांगितले की चीनच्या सैन्याला थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मध्यम तोफखाना उघडणे, ज्यासाठी फक्त आदेशांची प्रतीक्षा आहे. पुढे त्यांच्या पुस्तकात माजी लष्करप्रमुखांनी चीनच्या सैन्याला रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणती पावले उचलली आणि कोणत्या प्रकारची कारवाई केली हे सांगितले.

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंह