शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

गडकरींचं नवतंत्रज्ञान, चालकानं दारू प्यायल्यास गाडीचं इंजिनच सुरू होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:28 IST

रस्ते अपघात वाढत असून त्यासंदर्भात सरकारचे धोरण, याबाबत राज्यसभेत उत्तर देताना गडकरींनी नव तंत्रज्ञानाची माहिती दिली.

नवी दिल्ली - केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या कामामुळे चर्चेत असतात. रस्तेबांधणी असो किंवा परिवहन विभागातील काही निर्णय असो, गडकरींचं कामच बोलतंय. गडकरी यांच्या कामाचा झपाटा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास ही त्यांच्या कामाची शैली आहे. यापूर्वी 8 वी नापास तरुणही चारचाकी गाडीचा परवाना मिळवू शकतील, हा निर्णय घेऊन त्यांनी देशातील लाखो तरुणांना रोजगार दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मोठं कौतुकही झालं. त्यानंतर आता गडकरींनी संसदेत एका प्रश्नावर उत्तर देताना, अपघात कमी करण्यासाठीही नवीन तंत्रप्रणालीचा वापर करत असल्याचे म्हटले. 

रस्ते अपघात वाढत असून त्यासंदर्भात सरकारचे धोरण, याबाबत राज्यसभेत उत्तर देताना गडकरींनी नव तंत्रज्ञानाची माहिती दिली. वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचंही गडकरींनी सांगितले. तसेच दारू प्यायल्यानेच सर्वाधिक अपघात होतात. त्यामुळे दारू प्यायल्यानंतर गाडीचे इंजिनच सुरू होणार नाही, अशीही यंत्रप्रणाली गाडीत बसविण्यात येणार असल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच, गाडीचे टायर बनविण्यासाठी रबरासोबतच सिलिकॉनचाही वापर अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये केला जातो. तर, नायट्रोजनचाही उपयोग या टायरांच्या निर्मित्तीसाठी होतो, त्यामुळे टायर गरम होण्याचं प्रमाण अत्यल्प असते. आपल्या देशात गाडीचे टायर फुटूनही अनेक अपघात होतात. त्यामुळे याप्रणालीच्या टायरचा वापर करण्याचंही विचाराधीन असल्याचे गडकरी यांनी म्हटले. 

दरम्यान, यमुना एक्स्प्रेस महामार्गावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRajya Sabhaराज्यसभाcarकारAccidentअपघात