शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:03 IST

Mehbooba Mufti: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. "महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, तो भारत आता 'लिंचिस्तान'मध्ये बदलला आहे," असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. अनंतनाग येथे आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले.

देशाच्या विविध राज्यांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांचा संदर्भ देत मुफ्ती यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, भारतात सध्या भीती आणि असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, त्या सामान्य लोकांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला धोकादायक आहेत.

मेहबूबा मुफ्ती काय म्हणाल्या?

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, "स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी ज्या मूल्यांवर हा देश उभा केला, त्या मूल्यांना जमावाच्या हिंसाचारामुळे धक्का पोहोचत आहे. लोकांची सुरक्षा आणि सन्मान राखणे ही कोणत्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते, मात्र सध्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. हे भीतीचे वातावरण केवळ समाजासाठीच नाही, तर देशाच्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत घातक आहे. देशाला या विखारी वातावरणातून बाहेर काढण्यासाठी आता गंभीर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे."

राजकीय वाद पेटण्याची शक्यता

मेहबूबा मुफ्ती यांनी वापरलेल्या 'लिंचिस्तान' या शब्दामुळे राजकीय वर्तुळात मोठे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः भाजप आणि सत्ताधारी पक्षाकडून या विधानाचा तीव्र निषेध केला जाऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : India now 'Lynchistan,' says Mehbooba Mufti, slams central government.

Web Summary : Mehbooba Mufti accuses the government of transforming India into 'Lynchistan'. She expressed concern over mob lynching, citing a climate of fear and intolerance. Mufti emphasized the need to protect citizens' safety and dignity, calling for introspection to combat the divisive atmosphere.
टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारणBJPभाजपा