शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

...तर रस्ते प्रवास होणार फुकटात, टोल न भरता निघा सुस्साट; अट फक्त एकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 12:07 IST

मोदी सरकारकडून नव्या योजनेवर काम सुरू; अंमलबजावणी झाल्यास विनाटोल प्रवास करता येणार

नवी दिल्‍ली: रस्ते आणि वाहूतक कोंडी हे समीकरण नवीन नाही. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अनेकदा चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच अनेकदा टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या रांगा टाळण्यासाठी आता मोदी सरकार नव्या धोरणावर काम करत आहे. या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यास रस्ते वाहतूक वेगवान होईल.नवी योजना लागू झाल्यास राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्यास टोल भरावा लागणार नाही. टोल नाक्यावरील प्रत्येक लेनमध्ये एक वेगळ्या रंगाची रेष असेल. वाहतूक कोंडी झाल्यास, वाहनांची रांग रेषेच्या पुढे गेल्यास टोल ऑपरेटरला त्या लेनचा गेट उघडावा लागेल. त्यानंतर त्या लेनमधील सर्व वाहनं टोलशिवाय जाऊ शकतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सध्या या योजनेवर काम करत आहे.बाप रे...फास्टॅगच्या खात्यावर पैसै असतानाही भरावा लागतोय वाहनधारकांना दंडवाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फास्टॅग प्रणाली (fastag) आणण्यात आली. आता फास्टॅगचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र तरीही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे अहवाल वाहतूक मंत्रालयाला मिळाले आहेत. त्यामुळे मंत्रालयानं सर्व टोल नाके आणि तिथे लागणाऱ्या रांगांचं रियल टाईम मॉनिटरिंग सुरू केलं आहे.‘फास्टॅग’ असूनही खोळंबा, दुप्पट टोलवसुलीचाही भुर्दंड; रांगाच रांगा लागल्याने वाहनचालक हैराणगेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांची फौज टोल नाक्यावरील वाहतूक व्यवस्थापनाची देखरेख आणि विश्लेषण करत आहे. यामध्ये प्रादेशिक अधिकाऱ्यांपासून मुख्य व्यवस्थापकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 'फास्टॅगच्या माध्यमातून होणारे व्यवहार ६०-७० टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत गेले आहेत. ग्रामीण भागातही फास्टॅगचा वापर वाढला आहे. त्यामुळे आता आम्ही टोल नाक्यांवर होत असलेल्या कोंडीसाठी कोणतंही कारण देऊ शकत नाही,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.टोल नाक्यांपासून किती दूर रेष आखायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. टोल नाका ते रेष यांच्यातलं अंतर प्रत्येक ठिकाणी वेगळं असू शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. टोल नाक्यावरील वाहतूक आणि लेन्सची संख्या विचारात घेऊन रेष आखली जाईल, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं.

टॅग्स :tollplazaटोलनाकाFastagफास्टॅग