शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

माजी नगरसेविकेच्या मुलासह चार तरुणांना बेदम मारहाण कासमवाडीतील घटना : ३० ते ४० जणांनी केली मारहाण

By admin | Updated: March 5, 2016 23:48 IST

जळगाव: माजी नगरसेविका आशा शांताराम सूर्यवंशी यांचा मुलगा हर्षल, त्याचे मित्र तुषार राजेंद्र लोहार, श्याम ज्ञानेश्वर माहेरकर व विजय अरविंद सोनार (सर्व रा.रचना कॉलनी) या चार तरुणांना ३० ते ४० जणांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराद कासमवाडीत बेदम मारहाण केली. चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीचे कारण चौघांनीही सांगितले नाही, त्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

जळगाव: माजी नगरसेविका आशा शांताराम सूर्यवंशी यांचा मुलगा हर्षल, त्याचे मित्र तुषार राजेंद्र लोहार, श्याम ज्ञानेश्वर माहेरकर व विजय अरविंद सोनार (सर्व रा.रचना कॉलनी) या चार तरुणांना ३० ते ४० जणांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराद कासमवाडीत बेदम मारहाण केली. चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीचे कारण चौघांनीही सांगितले नाही, त्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
हर्षल सूर्यवंशी हा बाहेती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी दुपारी तो त्याचे मित्र हे महाविद्यालयातून कासमवाडीत आले असता तांबापुरा, सालार नगर व मास्टर कॉलनीतील ३० ते ४० तरुण हातात लाठ्याकाठ्या व फायटर घेऊन आले व चौघांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी रचना कॉलनीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मारहाण करणार्‍या तरुणांच्या समाजातील काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. जखमी झालेल्या या तरुणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन वेळा पोलीस परत
कासमवाडीत मारहाणीमुळे तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, रामकृष्ण पाटील, रत्नाकर झांबरे यांच्यासह कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठविले. मात्र मारहाण करणारे तेथून गायब झाले होते तर जखमी जिल्हा रुग्णालयात असल्याचे समजल्याने पोलीस तेथे पोहचले. जखमींना कारण विचारले असता एकानेही कारण सांगितले नाही. त्यानंतर दुसर्‍यांदा पुन्हा पोलीस जबाब घेण्यासाठी आले असता तेव्हाही त्यांनी जबाब दिला नाही, त्यामुळे पोलिसांना परत जावे लागले.
अदखलपात्र गुन्‘ाची नोंद
जखमी तरुण जबाब द्यायला तयार नसल्याने धारबळे यांनी त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर श्याम माहेरकर या तरुणाने बाबु पिंजारी व त्याच्या तीन साथीदारांनी काहीही कारण नसताना मारहाण केल्याचे सांगितले. त्यावरून अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, उपमहापौर सुनील महाजन, हर्षलचे वडील शांताराम सूर्यवंशी,नगरसेवक चेतन शिरसाळे व संजय कोल्हे आदींनी जिल्हा रुग्णालय गाठून जखमींची भेट घेतली.