शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

SBIच्या चुकीमुळेच विजय माल्ल्या पळाला; वकिलांनी दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 12:07 IST

विजय माल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी SBI ला सावध केले होते.

नवी दिल्ली - देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याबाबत रोज नवनवी माहिती समोर येत आहे. विजय माल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधीच सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी एसबीआयला सावध केले होते. बँकेने विजय माल्ल्याच्या विरोधात कोर्टात दाद मागावी असा सल्ला दवे यांनी बँकेला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच एसबीआयने विजय माल्ल्याला थांबवण्याबाबतचा कोणताही कायदेशीर सल्ला घेतला नाही असेही दवे यांनी म्हटले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाचे वकील दुष्यंत दवे यांनी  विजय माल्ल्या भारतातून पळून जाऊ शकतो याची कल्पना एसबीआयचे संचालक आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांना दिली होती. मात्र त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही. त्यामुळे विजय माल्ल्या देश सोडून जाऊ शकला. तसेच त्यांनी माल्ल्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे चार दिवसानंतर तो देश सोडून गेला.

विजय माल्ल्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यावर एसबीआयने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एसबीआयच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दुष्यंत दवे जे काही सांगत आहेत ते त्यांना सांगू दे आता मी एसबीआयची कर्मचारी नाही. तुम्ही याबाबत सध्याच्या संचालकांना किंवा अध्यक्षांना भेटू शकता असे उत्तर दिले.

एसबीआयचे कायदेविषयक सल्लागार आणि बँकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती दवे यांनी दिली. विजय माल्ल्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बैठक रविवारी पार पडली त्यानंतर सोमवारी मी त्यांची सुप्रीम कोर्टात वाट बघत होतो मात्र कोणीही आले नसल्याचं दवे यांनी सांगितलं. त्यानंतर विजय माल्ल्या ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळाला आहे 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याSBIएसबीआय