शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

गलवानमध्ये चीनचे चार लष्करी अधिकारी मारले गेले, चीनने अधिकृतपणे पहिल्यांदाच केले मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 07:27 IST

Galwan : भारतीय लष्कराच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पेंगाँग त्सो तलावाच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार भारत व चीनने केला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसांत हे सैन्य मागे घेण्यात आले. 

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या सीमेवरील पेंगाँग त्सो तलावाच्या दोन्ही काठांवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया भारत व चीनने पूर्ण केली आहे. दरम्यान गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या संघर्षात चीनचे चार लष्करी अधिकारी व सैनिक मारले गेल्याचा व पाच सैनिक जखमी झाल्याचे चीनच्या लष्कराचे मुखपत्र असलेल्या पीएलए डेलीने प्रसिद्ध केले आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पेंगाँग त्सो तलावाच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार भारत व चीनने केला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसांत हे सैन्य मागे घेण्यात आले. पूर्व लडाखमध्ये ९ महिन्यांपूर्वी चीनच्या लष्कराकडून करण्यात आलेले घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते; तर चीनचे ४०हून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा भारताने केला होता.  परंतु त्यावेळी चीनने त्यांच्या सैन्याची  नेमकी किती हानी झाली याची काहीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर गलवान खोऱ्यामध्येही चिनी सैनिकांशी भारतीय जवानांचा संघर्ष झाला होता. या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. भारत व चीनने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानेही प्रयत्न सुरू केले होते. यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या स्तरावर अनेक फेऱ्या पार पडल्या  दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये प्रारंभी झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या होत्या. अखेर पुन्हा चर्चा होऊन पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार करण्यात आला.

मतभेदांवर आज चर्चाभारत व चीनमध्ये असलेल्या मतभेदांच्या इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या, शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख