शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या 40 मिनिटांच्या भाषणात 17 वेळा काळया पैशांचा उल्लेख पण काय उपयोग ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 11:57 AM

नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामागे काही ठराविक उद्दिष्टये होती. त्यात सर्वात महत्वाचे उद्दिष्टय होते ते म्हणजे काळा पैसा संपवण्याचे.

ठळक मुद्देधक्कातंत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणाची खास ओळख. नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामागे काही ठराविक उद्दिष्टये होती.

नवी दिल्ली -  धक्कातंत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणाची खास ओळख. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी रामनाथ कोविंद यांची निवड असो किंवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा. या दोन्ही निर्णयांनी राजकीय तज्ञांपासून ते सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मागच्यावर्षी आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरचित्रवाहिनीवरुन जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय सुद्धा असाच धक्कादायक होता. 

देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणा-या या निर्णयामुळे श्रीमंतांपासून ते गरीबांपर्यंत सर्वचजण कामाला लागले. नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामागे काही ठराविक उद्दिष्टये होती. त्यात सर्वात महत्वाचे उद्दिष्टय होते ते म्हणजे काळा पैसा संपवण्याचे. आठ नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना 40 मिनिटांचे भाषण केले. या भाषणात 17 वेळा त्यांनी काळया पैशांचा उल्लेख केला. पण प्रत्यक्षात नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला हे तपासले तर मोदींचा निर्णय फसला असेच दिसते. 

ना मोदींच्या सरकारी यंत्रणेला काळया पैशाचा स्त्रोत शोधून काढता आला, ना या पैशाला बँकेत जमा करण्यापासून रोखता आले. संसदीय समितीने जेव्हा आरबीआयच्या अधिका-यांना नोटाबंदीनंतर किती काळा पैसा जमा झाला असा प्रश्न विचारला तेव्हा आरबीआय अधिका-यांकडे उत्तर नव्हते. ऑगस्ट महिन्यात आरबीआयने आकडेवारी जाहीर केली त्यावेळी सत्य परिस्थिती समोर आली.

नोटाबंदीनंतर चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या 99 टक्के नोटा आरबीआयकडे परत जमा झाल्या होत्या. मग काळा पैसा गेला कुठे ? नोटाबंदीच्या निर्णयाचा काय उपयोग झाला ? असे प्रश्न निर्माण होतात.  इतक्या मोठया निर्णयानंतर कमीत कमी 15 ते 20 टक्के काळा पैसा तरी बाहेर यायला हवा होता.  

टॅग्स :Note BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदी