शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

Raghuram Rajan: “राहुल गांधी अतिशय स्मार्ट, जिज्ञासू नेते”; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:27 IST

Raghuram Rajan: राहुल गांधी यांची तयार केली जात असलेली प्रतिमा चुकीची असून, हा प्रकार दुर्दैवी असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

Raghuram Rajan: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही यात्रा आता उत्तर भारतात पोहोचली असून, आतापर्यंत हजारो किमीचा प्रवास राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधींसोबत अनेक सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील मंडळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. यानंतर आता रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांचे तोंडभरून कौतुक केले असून, ते स्मार्ट आणि जिज्ञासू असल्याचे म्हटले आहे. 

एका मुलाखतीत बोलताना रघुराम राजन म्हणाले की, राहुल गांधी यांची पप्पू म्हणून तयार केलेली इमेज चुकीची आहे. अशी इमेज तयार करणे दुर्दैवी आहे. राहुल गांधी एक स्मार्ट, युवा, जिज्ञासू व्यक्ती आहेत. जोखीम आणि त्याचे मूल्यांकन करण्याची चांगली क्षमता असणे अतिशय महत्त्वाचे आहे. या गोष्टींची चांगली समज राहुल गांधी यांना आहे, असे रघुराम राजन म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी मूल्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. म्हणूनच भारत जोडो यात्रेत मी त्यांच्यासोबत सहभागी झालो, असे रघुराम राजन यांनी नमूद केले. 

राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही

या मुलाखतीत रघुराम राजन यांना तुम्ही राजकारणात येणार का, यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. केवळ पंतप्रधान मोदी यांची धोरणे, नीति यांच्यावर नाही, तर मनमोहन सिंह सरकारच्याही अनेक धोरणांवर टीका केली असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. तसेच २०२३ हे वर्ष अधिक आव्हानात्मक असणार आहे. युद्ध आणि अन्य कारणांमुळे जगातील आर्थिक समस्या वाढण्याची चिन्हे आहेत, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आपण भांडवलशाहीच्या विरोधात असू शकत नाही. परंतु आपल्याला स्पर्धेसाठी लढावे लागेल. आम्ही बाजारातील मक्तेदारीच्या विरोधात असू शकतो. छोटे उद्योग, मोठे उद्योग देशासाठी चांगले आहेत पण मक्तेदारी देशासाठी चांगली नाही, असेही रघुराम राजन यांनी स्पष्ट केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा