शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी शाळा, महाविद्यालये उभी करा, रघुराम राजन यांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 10:47 IST

सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी जास्तीत जास्त आधुनिक शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे असल्याचे रघुराम राजन म्हणाले. ‘इंडिया टुडे’ नियतकालिकातील 'How to fix the economy' लेखात रघुराम राजन यांनी  भारतीय अर्थव्यवस्थेवर सविस्तर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवत नाही, तर भारताच्या आर्थिक विकासाचा रस्ता सुद्धा बदलतो, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

पुतळे नव्हे तर शाळा, महाविद्यालये उभारावीतनरेंद्र मोदी सरकारच्या सामाजिक-राजकीय अजेंठ्यावर टीका करताना रघुराम राजन यांनी सांगितले की, " राष्ट्रीय किंवा धार्मिक महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभारण्याऐवजी भारताला जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे आहे. ज्यामुळे येथील मुलांचा मानसिक विकास होईल. ते जास्त सहिष्णु आणि एकमेकांशी सन्मानाने वागायला शिकतील. यामुळे ही मुलं भविष्यातील स्पर्धात्मक जगात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी होतील."

तणाव निर्माण करतोय हिंदू राष्ट्रवादसत्तेत जे असतात, त्यांची एक प्रवृत्ती असते की जास्तीत जास्त नियंत्रण पाहिजे असते. सध्याचे सरकार सुद्धा अपवाद नाही आहे. खासकरुन, जोपर्यंत या सरकारचा सोशल आणि पॉलिटिकल अजेंडा दिसून आहे, असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव निर्माण करत नाही, तर कोणत्याही प्रकारे भारताच्या हिताचा नाही. परंतु भारताच्या आर्थिक विकासावर याचा परिणाम होतो. ज्यामुळे सामजिक तणाव आणखीनच वाढतो, असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

सरकारी यंत्रणेचा दुरुपयोगसरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकार आपल्याच अधिकारांना कमकुवत करत आहे. कारण, त्यांना भविष्यातील सरकारद्वारे अशाच कारवाईची भीती वाटेल, असे राघुराम राजन यांनी म्हटले आहे. प्रोफेशनलिज्म म्हणजे चौकशी करणारी आणि टॅक्स यंत्रणांना कोणच्याही पाठिमागे पडण्याची परवानगी दिली नाही पाहिजे. याशिवाय, चौकशी यंत्रणांना सावधानता बाळगली पाहिजे की सर्व बिझनेसलाच कोठेतरी खोटे किंवा गुन्हेगार घोषित करु नये. तसेच, याचा राजकीय बदल्याच्या भावनेतून वापर केला जात आहे, असा संदेश जाऊ नये असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा