शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी शाळा, महाविद्यालये उभी करा, रघुराम राजन यांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 10:47 IST

सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी जास्तीत जास्त आधुनिक शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे असल्याचे रघुराम राजन म्हणाले. ‘इंडिया टुडे’ नियतकालिकातील 'How to fix the economy' लेखात रघुराम राजन यांनी  भारतीय अर्थव्यवस्थेवर सविस्तर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवत नाही, तर भारताच्या आर्थिक विकासाचा रस्ता सुद्धा बदलतो, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

पुतळे नव्हे तर शाळा, महाविद्यालये उभारावीतनरेंद्र मोदी सरकारच्या सामाजिक-राजकीय अजेंठ्यावर टीका करताना रघुराम राजन यांनी सांगितले की, " राष्ट्रीय किंवा धार्मिक महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभारण्याऐवजी भारताला जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे आहे. ज्यामुळे येथील मुलांचा मानसिक विकास होईल. ते जास्त सहिष्णु आणि एकमेकांशी सन्मानाने वागायला शिकतील. यामुळे ही मुलं भविष्यातील स्पर्धात्मक जगात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी होतील."

तणाव निर्माण करतोय हिंदू राष्ट्रवादसत्तेत जे असतात, त्यांची एक प्रवृत्ती असते की जास्तीत जास्त नियंत्रण पाहिजे असते. सध्याचे सरकार सुद्धा अपवाद नाही आहे. खासकरुन, जोपर्यंत या सरकारचा सोशल आणि पॉलिटिकल अजेंडा दिसून आहे, असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव निर्माण करत नाही, तर कोणत्याही प्रकारे भारताच्या हिताचा नाही. परंतु भारताच्या आर्थिक विकासावर याचा परिणाम होतो. ज्यामुळे सामजिक तणाव आणखीनच वाढतो, असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

सरकारी यंत्रणेचा दुरुपयोगसरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकार आपल्याच अधिकारांना कमकुवत करत आहे. कारण, त्यांना भविष्यातील सरकारद्वारे अशाच कारवाईची भीती वाटेल, असे राघुराम राजन यांनी म्हटले आहे. प्रोफेशनलिज्म म्हणजे चौकशी करणारी आणि टॅक्स यंत्रणांना कोणच्याही पाठिमागे पडण्याची परवानगी दिली नाही पाहिजे. याशिवाय, चौकशी यंत्रणांना सावधानता बाळगली पाहिजे की सर्व बिझनेसलाच कोठेतरी खोटे किंवा गुन्हेगार घोषित करु नये. तसेच, याचा राजकीय बदल्याच्या भावनेतून वापर केला जात आहे, असा संदेश जाऊ नये असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा