शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 09:42 IST

बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

नवी दिल्ली: मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा राजकीय भूकंप निर्माण झाला होता. २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं होतं. बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र या सर्व राजकीय घडामोडींवर ४१ दिवसांनंतर कमलनाथ यांनी सरकार वाचवण्यात का अपयश आलं याबाबत एक नवा खुलासा केला आहे.

कमलनाथ यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची काही आमदारांसोबत दिवसातून तीन वेळा बोलणं व्हायचं. तसेचकाही आमदारांनी आम्हाला पतर येणार असल्याचे सांगितले होते. आमदारांनी आम्हाला विश्वास दिला होता. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. त्यांच्यावर आम्ही अवलंबून राहिलो. त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवल्यानंच आम्हाला सरकार वाचवता आलं नाही, असा खुलासा कमलनाथ यांनी केला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे जुलैपासून भाजपशी संपर्कात होते- 

लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेभाजपाच्या संपर्कात होते असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. लोकसभेत एक लाखाहून अधिक मतांनी झालेला पराभव त्यांना पचवता आला नाही, त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला असं कमलनाथ यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीत कॉंग्रेस 15 पेक्षा जास्त जागा जिंकेल-

कमलनाथ यांनी मध्य प्रदेश पोटनिवडणुकीबाबतही अनेक दावे केले. ते म्हणाले की, हा आकडेवारीचा खेळ आहे. सध्या आमच्याकडे 92 आमदार आहेत आणि भाजपाकडे 107 आमदार आहेत. 24 जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. यात किमान 15 जागा आम्ही जिंकू असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपा