शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 09:42 IST

बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

नवी दिल्ली: मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा राजकीय भूकंप निर्माण झाला होता. २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं होतं. बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र या सर्व राजकीय घडामोडींवर ४१ दिवसांनंतर कमलनाथ यांनी सरकार वाचवण्यात का अपयश आलं याबाबत एक नवा खुलासा केला आहे.

कमलनाथ यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची काही आमदारांसोबत दिवसातून तीन वेळा बोलणं व्हायचं. तसेचकाही आमदारांनी आम्हाला पतर येणार असल्याचे सांगितले होते. आमदारांनी आम्हाला विश्वास दिला होता. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. त्यांच्यावर आम्ही अवलंबून राहिलो. त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवल्यानंच आम्हाला सरकार वाचवता आलं नाही, असा खुलासा कमलनाथ यांनी केला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे जुलैपासून भाजपशी संपर्कात होते- 

लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेभाजपाच्या संपर्कात होते असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. लोकसभेत एक लाखाहून अधिक मतांनी झालेला पराभव त्यांना पचवता आला नाही, त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला असं कमलनाथ यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीत कॉंग्रेस 15 पेक्षा जास्त जागा जिंकेल-

कमलनाथ यांनी मध्य प्रदेश पोटनिवडणुकीबाबतही अनेक दावे केले. ते म्हणाले की, हा आकडेवारीचा खेळ आहे. सध्या आमच्याकडे 92 आमदार आहेत आणि भाजपाकडे 107 आमदार आहेत. 24 जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. यात किमान 15 जागा आम्ही जिंकू असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपा