शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 09:42 IST

बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

नवी दिल्ली: मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा राजकीय भूकंप निर्माण झाला होता. २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं होतं. बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र या सर्व राजकीय घडामोडींवर ४१ दिवसांनंतर कमलनाथ यांनी सरकार वाचवण्यात का अपयश आलं याबाबत एक नवा खुलासा केला आहे.

कमलनाथ यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची काही आमदारांसोबत दिवसातून तीन वेळा बोलणं व्हायचं. तसेचकाही आमदारांनी आम्हाला पतर येणार असल्याचे सांगितले होते. आमदारांनी आम्हाला विश्वास दिला होता. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. त्यांच्यावर आम्ही अवलंबून राहिलो. त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवल्यानंच आम्हाला सरकार वाचवता आलं नाही, असा खुलासा कमलनाथ यांनी केला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे जुलैपासून भाजपशी संपर्कात होते- 

लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेभाजपाच्या संपर्कात होते असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. लोकसभेत एक लाखाहून अधिक मतांनी झालेला पराभव त्यांना पचवता आला नाही, त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला असं कमलनाथ यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीत कॉंग्रेस 15 पेक्षा जास्त जागा जिंकेल-

कमलनाथ यांनी मध्य प्रदेश पोटनिवडणुकीबाबतही अनेक दावे केले. ते म्हणाले की, हा आकडेवारीचा खेळ आहे. सध्या आमच्याकडे 92 आमदार आहेत आणि भाजपाकडे 107 आमदार आहेत. 24 जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. यात किमान 15 जागा आम्ही जिंकू असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपा