शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा कोणत्याही युतीला घाबरला नाही, भविष्यातही घाबरणार नाही", विरोधकांवर गंभीरची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 15:47 IST

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे.

delhi floods 2023 । नवी दिल्ली : सध्या देशाची राजधानी दिल्लीवर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. दिल्लीतील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणाच पाणी साचल्याचे चित्र आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला दोषी ठरवले आहे तर भाजपा खासदार गौतम गंभीरने सत्ताधारी 'आप'वर सडकून टीका केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील पायाभूत सुविधांवर किती पैसा खर्च झाला हे सांगावे, असे आवाहन गंभीरने केले आहे. याशिवाय विरोधकांच्या कोणत्याही बैठकीला अथवा युतीला भारतीय जनता पार्टी घाबरत नसल्याचे त्याने म्हटले आहे. 

गौतम गंभीर माध्यमांशी संवाद साधत असताना त्याला विरोधकांच्या बैठकीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने म्हटले, "देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकजुट होण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा त्यांनी चांगली मेहनत करावी. आगामी पंतप्रधान कोण असेल हे जनता ठरवेल आणि आम्ही त्यासाठी मेहनत घेत आहोत. भाजपा ना कोणत्या युतीशी घाबरली आहे ना भविष्यात घाबरेल."

'आप'वर टीकास्त्रदिल्लीत ओल्या दुष्काळाचे सावट पाहता गंभीरने सत्ताधारी आम आदमी पार्टीवर टीका केली. "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील जनतेला सांगावे लागेल की शहरातील पायाभूत सुविधांवर किती पैसा खर्च झाला आणि किती पैसा जाहिरातींवर खर्च केला गेला. दिल्लीला वाचवण्याची जबाबदारी आमची आहे", अशा शब्दांत गंभीरने अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. 

दिल्लीत पावसाची बॅटिंग अन् राजकारण तापलेउत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरयाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत. डोंगरावर पावसाचा कहर आहे. हिमाचलच्या कुल्लू पर्यटन स्थळांमध्ये मनाली, मणिकर्णा आणि बंजारमध्ये १७,००० पर्यटक अडकले आहेत. चार धाम यात्राही विस्कळीत झाली आहे.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआपlok sabhaलोकसभा