शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

"देशाला घराणेशाहीतून बाहेर पडायचंय...", खासदार गंभीरकडून PM मोदींचं तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:40 IST

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाबद्दल भाष्य केले होते. आता त्याने दिल्लीतील पक्षाच्या 'सर्व समाज संमेलना'त बोलताना विरोधकांना डिवचले. भाजप खासदार गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना म्हटले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने नेहमीच सर्वांना समानतेने पाहिले आहे."

तसेच काही लोकांनी आयुष्यभर तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारने नेहमीच सर्वांना समानतेने पाहिले आहे. देशाला घराणेशाहीच्या राजकारणातून पुढे जायचे आहे आणि विकास आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करायची आहे, असे भाजप खासदार गौतम गंभीरने दिल्लीतील पक्षाच्या सर्व समाज संमेलनात सांगितले.

WTC फायनलनंतर गंभीर चर्चेत भारतीय संघ पुन्हा एकदा ICC ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरल्याने सर्व स्तरातून टीम इंडियावर टीका केली जात आहे. २०१३ पासून आतापर्यंत भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पाचव्या आणिअखेरच्या दिवशी भारताचा २०९ धावांनी पराभव केला आणि प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप काबीज केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच माजी सलामीवीर गौतम गंभीरने भारतीय संघावर साधताना म्हटले, "मला वाटते की अनेक लोक हे बोलणार नाहीत, पण हे सत्य आहे आणि जगासमोर यायला हवे. आपल्या देशाला संघाची नाही, तर संघातील मोठ्या खेळाडूंची पूजा केली जाते. आम्ही खेळाडूला संघापेक्षा मोठा मानतो. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये संघ मोठा आहे, एक खेळाडू नाही. हेच कारण आहे की आम्ही दीर्घकाळ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, कारण आम्हाला संघापेक्षा एका खेळाडूचे वेड आहे.''

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाMember of parliamentखासदारNarendra Modiनरेंद्र मोदी