शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रंजन गोगोईंच्या मताचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; CJI चंद्रचूड म्हणाले, “एकदा पद गेले की...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:37 IST

CJI DY Chandrachud: अनुच्छेद ३७० वर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेतील मताचा संदर्भ दिला.

CJI DY Chandrachud: दिल्ली सेवा विधेयकाच्या बाजूने माजी सरन्यायाधीश आणि नामनिर्देशित राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांच्या टिप्पणीवर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अनुच्छेद ३७० वरील सुनावणीवेळी रंजन गोगोई यांच्या टिप्पणीचा न्यायालयात उल्लेख केला. यावर विद्यमान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य करत स्पष्ट भूमिका मांडली. 

न्यायालयाचा १९७३ मधील ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्याबाबत रंजन गोगाई यांनी आपले मत व्यक्त केले होते. राज्यसभेत बोलताना रंजन गोगोई म्हणाले होते की, 'संविधानाची मूळ संरचना' हा वादग्रस्त विषय आहे. यावर चर्चा होणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी गोगोई यांनी केली होती. याचा दाखला ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी अनुच्छेद ३७० च्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर दिला. 

राज्यसभेतील रंजन गोगोई यांच्या विधानाचा संदर्भ

सिब्बल यांनी रंजन गोगोई यांचे नाव घेतले नाही. परंतु राज्यसभेतील रंजन गोगोई यांच्या विधानाचा संदर्भ देत असल्याचे स्पष्ट करताना कपिल सिब्बल म्हणाले की, राज्यघटनेच्या मूलभूत रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सिद्धांत काळाच्या ओघात विकसित झाला. तिची 'मूलभूत रचने'बाबत चर्चा, वादविवाद होऊ शकतात. हा वादाचा मुद्दा असून त्याला कायदेशीर आधार आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. 

आम्ही न्यायाधीश नसतो, तेव्हा आमचे म्हणणे केवळ मत

सिब्बल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, सिब्बलजी, जर तुम्ही एखाद्या सहकाऱ्याचा उल्लेख केला, तर तुम्हाला विद्यमान सहकाऱ्याचा उल्लेख करावा लागेल. एकदा पदावरून पायउतार झालो, न्यायाधीश पद राहिले नाही की, आपली मते, आपले विचार, आपल्या भूमिका या आपल्या स्वतःच्या असतात. आम्ही न्यायाधीश नसतो, तेव्हा आमचे म्हणणे केवळ मत असते. ते बंधनकारक आदेश ठरत नाहीत, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. यावर, याबाबत मी अवाक् झालो आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. 

दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कपिल सिब्बल यांना सांगितले की, न्यायालयात जे घडते त्याची संसदेत चर्चा होत नाही आणि न्यायालयानेही संसदेत काय चालले आहे यावर चर्चा करणे टाळावे. तसेच रंजन गोगोई यांना आपले मत मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कपिल सिब्बल मंगळवारी  संसदेत नसल्यामुळे ते आता न्यायालयात येऊन संसदीय चर्चेला उत्तर देत आहेत, असा खोचक टोलाही तुषार मेहता यांनी लगावला.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडkapil sibalकपिल सिब्बलArticle 370कलम 370