शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

2030 पर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात करेल जगाचं नेतृत्व...; माजी अमेरिकन राजदूतांनी सांगितली खास कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 12:52 IST

आज भारत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकासाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. पुढील दशकात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 2 ट्रिलियन डॉलर एवढा खर्च केला जाईल.

नवी दिल्ली - भारत 2030 पर्यंत प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकतो, असे अमेरिकेच्या एका माजी उच्च राजदूताने म्हटले आहे. ते म्हणाले, जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही एकत्रीतपणे खूप काही करू शकतात. रिचर्ड वर्मा असे या माजी उच्च राजदुताचे नाव आहे. ते म्हणाले, "मी 2030 कडे पाहतो आणि मला एक भारत दिसतो, जो साधारणपणे प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल." (Former American envoy counts says India become the best country in the world by 2030 )

रिचर्ड वर्मा म्हणाले, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश, सर्वाधिक महाविद्यालयीन पदवीधर, सर्वात मोठा मध्यमवर्ग, सर्वाधिक सेल फोन आणि इंटरनेट वापरकर्ते, तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लष्करी ताकद आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 60 कोटी लोक आहेत.

आज भारत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकासाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. पुढील दशकात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 2 ट्रिलियन डॉलर एवढा खर्च केला जाईल. 2030 साठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा बराचसा भाग अद्याप तयार करणे बाकी आहे. यामुळे आज एकट्यानेच 100 नवीन विमानतळांची योजना अथवा बांधणी केली जात आहे, असे वर्मा म्हणाले.

New Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा

जिंदाल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्समध्ये तरुणांना संबोधित करताना भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत म्हणाले, आशियातील काम करणारा सर्वात तरुण वर्ग भारतात आहे. 2050 पर्यंत याचा आपल्याला फायदा होत राहील, असे वर्मा म्हणाले, ते 'ड्रायव्हिंग शेअर्ड समृद्धी - अमेरिका-भारत संबंधांसाठी 21 व्या शतकातील प्राधान्य' या विषयावर ते बोलत होते.

"आम्ही या युगाची सुरुवात 2000 मध्ये राष्ट्रपती क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याने करतो. अनेक दशके काहीसे दूर राहून तसेच कधी कधी वेगळे राहूनही हा एक यशस्वी प्रवास ठरला." वर्मा पुढे म्हणाले, आता संबंध अधिक वृद्धींगत करण्याची वेळ आली आहे. 

वर्मा म्हणाले, "भारत महामारीचा सामना करत आहे. दहशतवादाचा सामना करत आहे. असे असतानाही, तो नवीन शोध आणि उपाय बाजारात आणत आहे. जेणे करून, लोकांचे जीवन सोपे, सुरक्षित, समृद्ध, अधिक समावेशक आणि अधिक सुरक्षित होईल." वर्मा असेही म्हणाले, की त्यांनी जेव्हा भारताच्या प्रत्येक राज्याला भेट दिली, तेव्हा भारताच्या अशा वृद्धीचे चित्र त्यांनी पाहिल्यांदाच पाहिले. यामुळेच मी तुम्हा सर्वांच्या बाबतीत अत्यंत उत्सुक आहे. तुमच्या बोटावर जग आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तुमच्या देशाचे स्थान सर्वात पुढे असेल. तुमचे व्यवसाय जागतिक स्तरावर आर्थिक वाढ आणि नावीन्यपूर्णतेला शक्ती देत राहतील. तुम्हाला आज आणि भविष्यात कोणती भूमिका साकारायची आहे, ते तुम्ही सर्व जण निवडू शकता. "

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाUSअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी