शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

2030 पर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात करेल जगाचं नेतृत्व...; माजी अमेरिकन राजदूतांनी सांगितली खास कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 12:52 IST

आज भारत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकासाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. पुढील दशकात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 2 ट्रिलियन डॉलर एवढा खर्च केला जाईल.

नवी दिल्ली - भारत 2030 पर्यंत प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकतो, असे अमेरिकेच्या एका माजी उच्च राजदूताने म्हटले आहे. ते म्हणाले, जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही एकत्रीतपणे खूप काही करू शकतात. रिचर्ड वर्मा असे या माजी उच्च राजदुताचे नाव आहे. ते म्हणाले, "मी 2030 कडे पाहतो आणि मला एक भारत दिसतो, जो साधारणपणे प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल." (Former American envoy counts says India become the best country in the world by 2030 )

रिचर्ड वर्मा म्हणाले, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश, सर्वाधिक महाविद्यालयीन पदवीधर, सर्वात मोठा मध्यमवर्ग, सर्वाधिक सेल फोन आणि इंटरनेट वापरकर्ते, तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लष्करी ताकद आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 60 कोटी लोक आहेत.

आज भारत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकासाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. पुढील दशकात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 2 ट्रिलियन डॉलर एवढा खर्च केला जाईल. 2030 साठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा बराचसा भाग अद्याप तयार करणे बाकी आहे. यामुळे आज एकट्यानेच 100 नवीन विमानतळांची योजना अथवा बांधणी केली जात आहे, असे वर्मा म्हणाले.

New Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा

जिंदाल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्समध्ये तरुणांना संबोधित करताना भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत म्हणाले, आशियातील काम करणारा सर्वात तरुण वर्ग भारतात आहे. 2050 पर्यंत याचा आपल्याला फायदा होत राहील, असे वर्मा म्हणाले, ते 'ड्रायव्हिंग शेअर्ड समृद्धी - अमेरिका-भारत संबंधांसाठी 21 व्या शतकातील प्राधान्य' या विषयावर ते बोलत होते.

"आम्ही या युगाची सुरुवात 2000 मध्ये राष्ट्रपती क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याने करतो. अनेक दशके काहीसे दूर राहून तसेच कधी कधी वेगळे राहूनही हा एक यशस्वी प्रवास ठरला." वर्मा पुढे म्हणाले, आता संबंध अधिक वृद्धींगत करण्याची वेळ आली आहे. 

वर्मा म्हणाले, "भारत महामारीचा सामना करत आहे. दहशतवादाचा सामना करत आहे. असे असतानाही, तो नवीन शोध आणि उपाय बाजारात आणत आहे. जेणे करून, लोकांचे जीवन सोपे, सुरक्षित, समृद्ध, अधिक समावेशक आणि अधिक सुरक्षित होईल." वर्मा असेही म्हणाले, की त्यांनी जेव्हा भारताच्या प्रत्येक राज्याला भेट दिली, तेव्हा भारताच्या अशा वृद्धीचे चित्र त्यांनी पाहिल्यांदाच पाहिले. यामुळेच मी तुम्हा सर्वांच्या बाबतीत अत्यंत उत्सुक आहे. तुमच्या बोटावर जग आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तुमच्या देशाचे स्थान सर्वात पुढे असेल. तुमचे व्यवसाय जागतिक स्तरावर आर्थिक वाढ आणि नावीन्यपूर्णतेला शक्ती देत राहतील. तुम्हाला आज आणि भविष्यात कोणती भूमिका साकारायची आहे, ते तुम्ही सर्व जण निवडू शकता. "

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाUSअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी