शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:12 IST

झामुमोच्या उमेदवारासाठी प्रचारसभा, भाजपच्या काळात बेरोजगारी वाढली

झारखंड : झारखंडमध्ये विरोधी पक्षांची आघाडी सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले.

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी येथे झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार कितुबुद्दीन शेख यांना पाठिंबा देणाºया प्रचार सभेत गांधी म्हणाले की, काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने बहुमत मिळवल्यास शेतकºयांना भाताच्या प्रत्येक क्विंटलमागे २,५०० रुपये किमान आधारभूत भाव मिळेल.

विरोधकांच्या आघाडीचे पहिले प्राधान्य हे दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास असेल. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या सरकारांनी २,५०० रुपये किमान आधारभूत भावाने तांदूळ विकत घेतला तोच कित्ता झारखंडमध्येही आम्ही निवडणूक जिंकलो तर गिरवला जाईल, असे गांधी म्हणाले.

काँग्रेसने नेहमीच दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असे ठासून सांगून राहुल गांधी यांनी देशात बेरोजगारीत वाढ केल्याबद्दल केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. आज बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे गरीब वर्गाला मोठा फटका बसल्याचे व आजही लोकांना त्यात भरडून निघावे लागत असल्याचे ते म्हणाले. तरीही भाजपचे सरकार केवळ १०-१५ उद्योगपतींच्या लाभांसाठी काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची ही प्रचारसभा केवळ १० मिनिटे चालली. 

६२ टक्के मतदान

रांची : झारखंड विधानसभेच्या तिसºया टप्प्यात १७ जागांच्या निवडणुकीसाठी ६२.३५ टक्के मतदान झाले. शहरी भागात झालेले हे मतदान शांततेत पार पडले. ५६ लाखांपेक्षा अधिक मतदारांनी ३०९ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय ईव्हीएम यंत्रात बंदिस्त केला. मुख्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे यांनी सांगितले की, सायंकाळी मतदान संपेपर्यंत ६२.३५ टक्के मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरी