शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:12 IST

झामुमोच्या उमेदवारासाठी प्रचारसभा, भाजपच्या काळात बेरोजगारी वाढली

झारखंड : झारखंडमध्ये विरोधी पक्षांची आघाडी सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले.

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी येथे झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार कितुबुद्दीन शेख यांना पाठिंबा देणाºया प्रचार सभेत गांधी म्हणाले की, काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने बहुमत मिळवल्यास शेतकºयांना भाताच्या प्रत्येक क्विंटलमागे २,५०० रुपये किमान आधारभूत भाव मिळेल.

विरोधकांच्या आघाडीचे पहिले प्राधान्य हे दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास असेल. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या सरकारांनी २,५०० रुपये किमान आधारभूत भावाने तांदूळ विकत घेतला तोच कित्ता झारखंडमध्येही आम्ही निवडणूक जिंकलो तर गिरवला जाईल, असे गांधी म्हणाले.

काँग्रेसने नेहमीच दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असे ठासून सांगून राहुल गांधी यांनी देशात बेरोजगारीत वाढ केल्याबद्दल केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. आज बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे गरीब वर्गाला मोठा फटका बसल्याचे व आजही लोकांना त्यात भरडून निघावे लागत असल्याचे ते म्हणाले. तरीही भाजपचे सरकार केवळ १०-१५ उद्योगपतींच्या लाभांसाठी काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची ही प्रचारसभा केवळ १० मिनिटे चालली. 

६२ टक्के मतदान

रांची : झारखंड विधानसभेच्या तिसºया टप्प्यात १७ जागांच्या निवडणुकीसाठी ६२.३५ टक्के मतदान झाले. शहरी भागात झालेले हे मतदान शांततेत पार पडले. ५६ लाखांपेक्षा अधिक मतदारांनी ३०९ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय ईव्हीएम यंत्रात बंदिस्त केला. मुख्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे यांनी सांगितले की, सायंकाळी मतदान संपेपर्यंत ६२.३५ टक्के मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरी