शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

आशेचा किरण! भूस्खलनानंतर केरळच्या जंगलात चमत्कार; ५ दिवसांनंतर ४ मुलांना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:02 IST

वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात अजूनही लोक बेपत्ता आहेत. या भीषण आपत्तीदरम्यान, एक दिलासादायक घटना समोर आली आहे.

केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात अजूनही लोक बेपत्ता आहेत. या भीषण आपत्तीदरम्यान, एक दिलासादायक घटना समोर आली आहे. जिथे भूस्खलनग्रस्त वायनाडमध्ये केरळच्या वन अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या ऑपरेशननंतर दुर्गम आदिवासी वस्तीतून ६ जणांची सुटका केली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, "आम्ही एकजुटीने पुन्हा उभं राहू" असं म्हटलं आहे. कलपेट्टा परिक्षेत्राचे वन अधिकारी के. हशीस यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने गुरुवारी एका आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी जंगलातील धोकादायक रस्ता ओलांडून ही बचाव मोहीम यशस्वी केली. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये आदिवासी समाजातील एक ते चार वर्षे वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे.

वायनाडच्या पनिया समुदायातील हे कुटुंब डोंगरमाथ्यावरील एका गुहेत अडकलं होतं. बाजुला खोल दरी होती आणि तिथे पोहोचण्यासाठी टीमला साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. पीटीआयशी बोलताना, हशीस म्हणाले की, त्यांनी गुरुवारी आई आणि चार वर्षांच्या मुलाला वनक्षेत्राजवळ भटकताना पाहिलं आणि चौकशी केल्यावर कळलं की त्यांची इतर तीन मुलं आणि त्यांचे वडील अन्नाविना गुहेत अडकले आहेत.

हशीस म्हणाले की, हे कुटुंब आदिवासी समाजाच्या एका विशेष वर्गातील आहेत, जे सहसा बाहेरील लोकांशी संवाद करणं टाळतात. ते सामान्यतः जंगलात मिळणाऱ्या गोष्टींवर अवलंबून असतात. मात्र भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे त्यांना आता अन्न मिळू शकलेलं नाही. आम्ही आमच्याबरोबर जे काही अन्नपदार्थ घेतले होते ते आम्ही त्यांना दिलं. खूप समजावून सांगितल्यावर, मुलांचे आई-वडील आमच्यासोबत यायला तयार झाले.  

टॅग्स :KeralaकेरळRainपाऊस