शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

जगासमोर कलम 370चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा; भारताचे पाकला खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 6:28 PM

भारतानं जम्मू-काश्मीरमधल्या कलम 370मधील तरतुदी शिथिल करून त्याचे दोन प्रदेशात विभाजन केले आहे.

नवी दिल्लीः केंद्रातल्या मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधल्याकलम 370मधील तरतुदी शिथिल करून त्याचे दोन प्रदेशात विभाजन केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केल्यापासून पाकिस्तान भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आगपाखड करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सैरभैर झाले असून, त्यांनी संयुक्त राष्ट्रासह इतर जगातील देशांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानला कुठूनही या प्रकरणात मदत मिळालेली नाही. चीननंही पाकिस्तानकडे पाठ फिरवलेली आहे. त्यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.भारतानं जगासमोर स्वतःचा पक्ष ठेवला आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे, तो आमचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तान जीसुद्धा पावलं उचलतो आहे. तो सैरभैर झाल्यामुळेच असं करतोय. पाकिस्ताननं हवाई हद्द बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तसेच इतर जे काही रागाच्या भरात निर्णय घेत सुटला आहे, त्याचा पुनर्विचार करण्याचा आम्ही सल्ला दिला आहे. जगाचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्यासाठीच पाकिस्तान असं करतोय. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी हा मुद्दा उपस्थित केला, तर तिथेसुद्धा आम्ही त्यांना उत्तर देऊ, आम्ही जगातल्या अनेक राष्ट्रांना सांगितलं आहे की, हा आमचा अंतर्गत विषय आहे. आम्ही जोसुद्धा निर्णय घेतला आहे, तो आमचा अंतर्गत विषय आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनताही पाकिस्तानविरोधात प्रदर्शन करत आहे. त्यांची समस्या सोडवण्याची गरज आहे. परंतु भारताची पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात काय रणनीती आहे, याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. 

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीर