शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

चिनी कंपन्यांची भारतातील थेट गुंतवणूक वेगाने घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:02 IST

एफडीआय इन्फ्लो फिगर्सने ही माहिती उघड केली. त्यात म्हटले आहे की, भारतात चीनच्या कंपन्यांनी २०१७-२०१८ मध्ये ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली.

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लडाखवरून भारत आणि चीन यांच्या संबंधांत मोठा तणाव निर्माण झालेला असला तरी चीनच्या कंपन्यांची भारतातील थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) गेल्या तीन वर्षांत वेगाने खाली येत आहे.

एफडीआय इन्फ्लो फिगर्सने ही माहिती उघड केली. त्यात म्हटले आहे की, भारतात चीनच्या कंपन्यांनी २०१७-२०१८ मध्ये ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. फक्त थेट विदेशी गुंतवणूकच कमी होत आहे असे नाही. भारतीय कंपन्यादेखील चीनमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांत कमीकमीच गुंतवणूक करीत आहेत.

कोणत्याही चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीस परवानगी न देण्याचा सरकारचा विचार आहे का, अशी विचारणा लोकसभेत मंत्र्यांना करण्यात आल्यावर त्यांनी स्पष्टपणे ‘नाही’ असे उत्तर दिले. वाणिज्य, उद्योग व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत दिलेल्या माहितीत म्हटले की, चीनसोबत भारताच्या व्यापारातील तूट ही एप्रिल-जून २०२०-२०२१ मध्ये ५.८ अब्ज डॉलर्स एवढी खाली आली. कारण ही तूट गेल्या वर्षी आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १३.१ अब्ज डॉलर्सची होती. एवढेच काय दोन देशांतील एकूण व्यापार तूट आर्थिक वर्ष २०२१ च्या एप्रिल-जून या तिमाहीत १६.५५ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली आली. ही तूट २०१९-२०२० वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २१.४२ अब्ज डॉलर्सची होती.

ही व्यापार तूट कमी करण्यासाठी चीनवर व्यापार प्रतिबंध घातले का? असे विचारल्यावर गोयल म्हणाले की, या क्षणाला सुमारे ५५० उत्पादने ही विदेश व्यापार धोरणाअंतर्गत फक्त चीनच नव्हे, तर सगळ्या देशांकडून आयातीसाठी प्रतिबंधित/निर्बंधित वर्गातील आहेत. त्यामुळे बंदी ही फक्त चीनपुरतीच नाही. अन्य देशांचाही या बंदीत समावेश असून याबाबत अधिक विचारविनिमय सुरू आहे.चीनमधून गुंतवणुकीचा ओघवर्ष २०१७-२०१८ २०१८-२०१९ २०१९-२०२०दशलक्ष डॉलर्स ३५०.२२ २२९.० १६३.७७भारतातून चीनमध्ये झालेली गुंतवणूक (आॅगस्ट २०२० पर्यंतची आकडेवारी)वर्ष २०१७ २०१८ २०१९ २०२०दशलक्ष डॉलर्स ४९.१९ १२.६१ २७.५७ २०.६३

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावFDIपरकीय गुंतवणूक