शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

'ऐश्वर्या राय मॉडर्न, मी साधा; इच्छेविरुद्ध केलं लग्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 12:13 IST

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इच्छेविरुद्ध ऐश्वर्या रायशी लग्न लावण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा आता तेज प्रताप यांनी केला आहे.

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इच्छेविरुद्ध ऐश्वर्या रायशी लग्न लावण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा आता तेज प्रताप यांनी केला आहे. 'मी एक साधाभोळा माणूस आहे.  इच्छेविरुद्ध माझं ऐश्वर्या राय बरोबर राजकीय फायद्यासाठी जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. तेव्हापासून माझा कोंडमारा सुरु होता' असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे. 

'मला लग्न करायचं नव्हतं हे मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं होतं. पण त्यावेळी कोणीच माझं ऐकल नाही. आमच्या दोघांची मन जुळत नाहीत. आमचे स्वभाव भिन्न आहेत. माझ्या सवयी सामान्य आहेत. तर ऐश्वर्या आधुनिक विचारांची मुलगी आहे. दिल्लीमध्ये तिचे शिक्षण झाले. त्यामुळेच तिला शहरी आयुष्य जगण्याची सवय आहे' असेही तेज प्रताप यांनी सांगितले. 

ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण झाला आहे. त्यामुळे तेज प्रताप यादव यांनी थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. याबाबत माहिती मिळताच, ऐश्वर्या यांचे वडिल आणि बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांनी लालू प्रसाद यादव यांचे घर गाठले. तसेच घटस्फोटाच्या निर्णयाबाबत चर्चाही केल्याचे समजते. विशेष म्हणजे याच वर्षी 12 मे रोजी धुमधडाक्यात तेज प्रताप यांचा विवाह झाला होता. मात्र, सहा महिन्यांतच दोघांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. मी ऐश्वर्यासोबतच नातं पुढे नेऊ इच्छित नसल्याचे तेजप्रताप यांनी म्हटलं आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव सध्या रांचीतील राजेंद्र इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील पेईंग वॉर्डमध्ये आहेत. चारा घोटाळाप्रकरणी ते शिक्षा भोगत आहेत.

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवBiharबिहारDivorceघटस्फोट