शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Kerala Floods : बीफ फेस्टिव्हलमुळे केरळमध्ये महाप्रलय, भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 16:36 IST

कर्नाटकातील भाजपाचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ आता केरळमध्ये आलेल्या महाप्रलयासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - कर्नाटकातील भाजपाचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.  बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आता केरळमध्ये आलेल्या महाप्रलयासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'केरळमधील लोक बीफ खातात त्यामुळेच तिथे पूर आला, असे वादग्रस्त विधान पाटील यांनी केले आहे.

पाटील असं म्हणाले की,  'हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न झाला, तर धर्म त्यांना शिक्षा देईल. केरळमध्ये जे झाले आहे, ते याचे उदाहरण आहे. केरळला देवभूमी म्हटले जाते. पण येथे उघडपणे गोहत्या होतात.

केंद्र सरकारकडून पशू बाजारात जनावरे खरेदी-विक्रीवर बंदी आणल्यानंतर याचा विरोध दर्शवण्यासाठी जूनमध्ये केरळ काँग्रेसनं विधानसभेत बीफ फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या फेस्टिव्हलच्या वर्षभराच्या आतच राज्यामध्ये पूर आला.  

दरम्यान, बीएस येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा दावाही त्यांनी यावेळेस केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, जेव्हा भाजपा सत्तेत येईल, तेव्हा आम्ही गोमांसावर बंदी घालू. तर दुसरीकडे त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यावरही हल्लाबोल चढवला. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी कुमारस्वामी मंदिर-मशिदींमध्ये पळताहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरBJPभाजपाbeefगोमांसcongressकाँग्रेस