शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पाच राज्यांनीच लागू केला नवा मोटर वाहन कायदा, दंडाच्या रकमेत कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 5:30 AM

काही राज्यांच्या परिवहन विभागाने मोटर वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत बदल सुचविणारे प्रस्ताव संबंधित राज्य सरकारांकडे पाठविले आहेत.

नवी दिल्ली : नव्या मोटर वाहन कायद्याची केंद्र सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर तब्बल पाच आठवड्यांनी देशातील गुजरात, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, आसाम या राज्यांनी तो कायदा लागू केला आहे.काही राज्यांच्या परिवहन विभागाने मोटर वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत बदल सुचविणारे प्रस्ताव संबंधित राज्य सरकारांकडे पाठविले आहेत. ठराविक गुन्ह्यासाठी सुसंगत दंड आकारण्यात यावा, असे सुचविण्यात आले असून ते सारे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. राजस्थानच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही वाहनचालकांकडून अवाजवी दंड आकारणार नाही. ठराविक गुन्ह्यांमध्ये चालकांनी दंडाची रक्कम वाहतूक नियंत्रण अधिकाºयाकडे भरायची आहे. त्यासाठी त्यांना न्यायालयात येण्याची आवश्यकता नाही.बिहार सरकार नवा मोटर वाहन कायदा लागू केल्याची अधिसूचना लवकरच जाहीर करणार आहे. महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड हे तीन महिन्यांनी हा कायदा अमलात आणण्याची शक्यता आहे. वाहतूकविषयक गुन्ह्यांसाठी दंडाची रक्कम किती ठेवावी, हे ठरविण्याचा राज्य सरकारांना अधिकार आहे. मात्र, नव्या मोटर वाहन कायद्यात दंडाची जी रक्कम आहे त्यापेक्षा कमी दंड राज्य सरकारने आकारायचे ठरविले तर गोंधळ निर्माण होऊ शकतो.वाहतूक नियमांचे नीट पालन न होणे, त्यामुळे अपघातांत वाढ होणे या सर्व गोष्टी कमी करण्यासाठी विविध राज्ये नवा मोटर वाहन कायदा त्वरित लागू करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दंडाच्या रकमेत मोठी कपात करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतल्यानंतर ते होऊ शकले नाही. एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी देशात समान दंड असणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन चर्चा घडवून आणावी असे अधिकाऱ्यांना वाटते.दिल्लीत बीएस ६ वाहने एप्रिलपासून- दिल्लीतील हवा अत्यंत प्रदूषित होण्यास वाहनांपासून होणारे प्रदूषण हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. बीएस ६ निकषांवर आधारित वाहने दिल्लीमध्ये एप्रिल २०२० पासून वापरात येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.- बीएस-६ निकषांवर आधारित पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने दिल्ली-एनसीआर भागात याआधीच वापरात आहेत. या वाहनांमुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी