शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ उद्या लखीमपूर खीरीला पोहोचणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 22:26 IST

rahul gandhi : लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी म्हणजेच उद्या लखीमपूर खीरी येथे जाणार आहेत. राहुल गांधी हे या दौऱ्यावेळी पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. (rahul gandhi to visit lakhimpur kheri in uttar pradesh, tomorrow)

यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधींसह 10 जणांविरोधात शांतता भंग केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यामध्ये काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुड्डा आणि अजय कुमार लल्लू यांची नावे आहेत.

लखीमपूर खीरीला जाताना प्रियंका गांधी यांना सीतापूरच्या हरगाव येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. यानंतरच त्यांना अटक करण्यात आली. सध्या प्रियांका गांधी यांना ज्या पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, त्याला तात्पुरते कारागृह म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांनी मंगळवारी सकाळी आपल्याला एका दिवसापेक्षा जास्त काळ ताब्यात घेतल्यामुळे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, "नरेंद्र मोदी सर, तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेश आणि एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून ताब्यात घेतले आहे. पण ज्याने शेतकऱ्यांना चिरडले त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही."

दरम्यान,  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी  (Lakhimpur Kheri) येथे रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळानंतर आता परिस्थिती शांत झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था चोख आणि कडक ठेवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीसाठी प्रशासन सज्ज आहे.

काय आहे प्रकरण?उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी