शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ उद्या लखीमपूर खीरीला पोहोचणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 22:26 IST

rahul gandhi : लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी म्हणजेच उद्या लखीमपूर खीरी येथे जाणार आहेत. राहुल गांधी हे या दौऱ्यावेळी पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. (rahul gandhi to visit lakhimpur kheri in uttar pradesh, tomorrow)

यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधींसह 10 जणांविरोधात शांतता भंग केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यामध्ये काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुड्डा आणि अजय कुमार लल्लू यांची नावे आहेत.

लखीमपूर खीरीला जाताना प्रियंका गांधी यांना सीतापूरच्या हरगाव येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. यानंतरच त्यांना अटक करण्यात आली. सध्या प्रियांका गांधी यांना ज्या पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, त्याला तात्पुरते कारागृह म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांनी मंगळवारी सकाळी आपल्याला एका दिवसापेक्षा जास्त काळ ताब्यात घेतल्यामुळे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, "नरेंद्र मोदी सर, तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेश आणि एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून ताब्यात घेतले आहे. पण ज्याने शेतकऱ्यांना चिरडले त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही."

दरम्यान,  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी  (Lakhimpur Kheri) येथे रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळानंतर आता परिस्थिती शांत झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था चोख आणि कडक ठेवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीसाठी प्रशासन सज्ज आहे.

काय आहे प्रकरण?उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी