शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
3
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
4
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
5
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
6
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
7
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
8
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
9
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
10
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
11
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
12
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
13
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
14
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
15
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
16
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
17
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
18
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
19
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
20
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ उद्या लखीमपूर खीरीला पोहोचणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 22:26 IST

rahul gandhi : लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी म्हणजेच उद्या लखीमपूर खीरी येथे जाणार आहेत. राहुल गांधी हे या दौऱ्यावेळी पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. (rahul gandhi to visit lakhimpur kheri in uttar pradesh, tomorrow)

यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधींसह 10 जणांविरोधात शांतता भंग केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यामध्ये काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुड्डा आणि अजय कुमार लल्लू यांची नावे आहेत.

लखीमपूर खीरीला जाताना प्रियंका गांधी यांना सीतापूरच्या हरगाव येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. यानंतरच त्यांना अटक करण्यात आली. सध्या प्रियांका गांधी यांना ज्या पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, त्याला तात्पुरते कारागृह म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांनी मंगळवारी सकाळी आपल्याला एका दिवसापेक्षा जास्त काळ ताब्यात घेतल्यामुळे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, "नरेंद्र मोदी सर, तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेश आणि एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून ताब्यात घेतले आहे. पण ज्याने शेतकऱ्यांना चिरडले त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही."

दरम्यान,  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी  (Lakhimpur Kheri) येथे रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळानंतर आता परिस्थिती शांत झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था चोख आणि कडक ठेवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीसाठी प्रशासन सज्ज आहे.

काय आहे प्रकरण?उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी