शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

७ शस्त्रक्रिया, ९ विभागाचे तज्ज्ञ, १९४ दिवस उपचार... अन् अनुराग पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 12:49 IST

दिल्लीच्या एम्समध्ये घडलेली ही अशी पहिलीच केस... वाचा अनुरागच्या संघर्षाशी कहाणी

AIIMS Anurag Maloo Story :  गिर्यारोहक अनुरागची पॅशन, त्याचे धाडस आणि डॉक्टरांच्या मेहनतीची कहाणी सध्या प्रचंड चर्चिली जात आहे. ८० मीटर खोल बर्फाच्या खड्ड्यात पडलेला अनुराग ७२ तास तिथेच होता. सुमारे २०० दिवस हॉस्पिटलमध्ये राहिला. सात शस्त्रक्रिया झाल्या. अखेर मृत्यूशी झुंज देत, काळाच्या हल्ल्यावर मात करत अनुराग पुन्हा उभा राहिला. नऊ नंबरच्या बेडवर पडलेल्या अनुरागने पुन्हा जमिनीवर पाय ठेवला आणि स्वत:च्या बळावर पुढे पाऊल टाकले. तो म्हणाला की, मी आयुष्यात पुन्हा उभे राहण्याचा विचारही केला नव्हता, पण इथे आल्यानंतर मला समजले की एम्स हे एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाही आणि इथले डॉक्टर हे देवापेक्षा कमी नाहीत.

नक्की काय घडलं?

अनुराग मालू नेपाळच्या अन्नपूर्णा पर्वतावर चढाई करत होता. यावर्षी १७ एप्रिलला त्याचा अपघात झाला. ८० मीटर खोल बर्फाच्या खड्ड्यात ७२ तास तो अडकून राहिला. तो तेथे अडकला असल्याचे एका पोलिश गिर्यारोहकाला समजले. त्याला बाहेर काढल्यानंतर आधी बेस कॅम्प आणि नंतर पोखरा आणि नंतर काठमांडूला नेण्यात आले. तेथे अनुरागवर २० दिवस उपचार सुरू होते.

'एम्स'मधील अशी पहिलीच घटना

एम्सच्या बर्न आणि प्लास्टिक सर्जरी विभागाचे एचओडी डॉ मनीष सिंघल यांनी सांगितले की, त्यांना ५ मे रोजी फोन आला होता. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना फोन केला होता आणि आशा सोडून दिल्या होत्या. १३ जुलै रोजी त्याला आमच्या केंद्रात म्हणजेच एम्समध्ये दाखल करण्यात आले. १७४ दिवस एम्समध्ये उपचार करण्यात आले. या काळात त्याच्यावर सात शस्त्रक्रिया झाल्या आणि आता त्याला नवीन जीवन मिळाल्याने तो आनंदी आहे. डॉक्टर म्हणाले की, एम्समध्येही अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, जेव्हा रुग्णावर इतका वेळ उपचार सुरू आहेत.

आईस बर्नचा बळी ठरलेला होता अनुराग!

डॉ. मनीष यांनी सांगितले की, उणे ३० अंश तापमानामुळे तो आईस बर्नचा बळी ठरला होता. शरीराची उजवी बाजू पूर्णपणे जळाली होती. त्वचा निघून गेली होती. जेव्हा त्याला आणण्यात आले तेव्हा त्यावा पाहणारे पहिले व्यक्ती होते ICU चे प्रभारी डॉ कपिल सोनी. त्याची किडनी निकामी झाली होती. तो डायलिसिसवर होता. छातीत संसर्ग झाला होता. बीपी लो होते. सुरुवातीचे काही दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले होते. पहिल्या शस्त्रक्रियेत आईस बर्नची जागा म्हणजेच फ्रॉस्ट बाईट कापून काढून टाकण्यात आली. संसर्ग इतका गंभीर होता की त्याचे वजन ६५ किलोवरून ४२ किलोवर आले. तो ४४ दिवस आयसीयूमध्ये राहिला आणि ९ विभागातील तज्ज्ञांनी एकत्रितपणे त्याच्यावर उपचार केले. स्किन ग्राफ्टिंग केले. शव देणगीतून संवर्धन केलेली त्वचा त्याच्यावर रोपण करण्यात आली. नंतर सुधारणा झाली आणि आता तो आपल्या पायांवर उभा आहे.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयdoctorडॉक्टरdelhiदिल्लीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी