शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

दिल्लीकरांनी पहिल्यांदाच पाहिले पोलिसांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 6:53 AM

अधिकारीही अस्वस्थ : राजधानीतील वातावरण ढवळून निघाले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतीलपोलिसांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केल्याने मंगळवारी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये, तसेच रस्त्यांवर गस्ती घालणाऱ्या पोलिसांची संख्या कमी दिसत होती. असंख्य आंदोलने अनुभवणाºया दिल्लीकरांना पहिल्यांदाच पोलिसांचे आंदोलन पाहायला मिळाले.

या आंदोलनामुळे पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईकही अस्वस्थ झाले. शिस्तबद्ध दलाप्रमाणे आपले वर्तन असावे. सरकार आणि समाजाला आपल्याकडून कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था हीच आपली जबाबदारी आहे. गेले काही दिवस आपली परीक्षा पाहणारे ठरले. न्यायालयीन चौकशीची प्रक्रिया सुरू असून प्रत्येकाने त्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात पोलीस-वकील यांच्यातील वादाचा अहवाल मंगळवारी दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाकडे सादर केला. शनिवारी घडलेल्या या घटनेची विस्तृत माहिती या अहवालात देण्यात आल्याचे गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारनंतर सोमवारपर्यंत घडलेल्या इतर कोणत्याही घडामोडींचा यात उल्लेख करण्यात आलेला नसल्याचेही अधिकाºयांनी स्पष्ट केले.

साकेत न्यायालयाच्या परिसरात सोमवारी वकिलांनी पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी साकेत पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हायरल व्हिडिओमध्ये वकील पोलिसाला मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या आंदोलनावर वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांचे माजी जनसंपर्क अधिकारी मधुर वर्मा, माजी उपायुक्त अस्लम खान, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य, दिल्ली पोलीस दलातील माजी प्रवक्ते दीपेंद्र पाठक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांचा निषेध केला आहे. दरम्यान, व्यवसायाची बदनामी करणाºया वकिलांचा शोध घेण्याचे आवाहन करणारे पत्र बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार संघटनांना पाठवले आहे. कौन्सिलचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा म्हणाले की, बार संघटनांची निष्क्रियता अशा वकिलांचे मनोबल वाढवते. त्यामुळे त्याचा परिणाम उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानात होतो.गृहमंत्री कुठे आहेत? -काँग्रेसच्स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांच्या इतिहासात दिल्लीत पोलिसांना आंदोलन करावे लागले नाही. मात्र, भाजपच्या नव्या भारतात पोलिसांचे आंदोलन म्हणजे देशाची व्यवस्थाच कोलमडल्याचेच लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली.च्केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. पोलिसांनाच आंदोलन करावे लागत असेल तर सामान्य जनतेने काय करावे, असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालय