शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

भारत-बांगलादेश सीमेवर पहिल्यांदाच महिला गार्ड तैनात, घनदाट जंगलाच्या मध्यभागी शत्रूंशी लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 23:18 IST

घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते. 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भारत आणि बांगलादेशच्या सीमेदरम्यान शेकडो चौरस किलोमीटर पसरलेल्या सुंदरबन क्षेत्राची सुरक्षा हे एक अतिशय आव्हानात्मक काम आहे. या भागातून जनावरे व अंमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते. 

बीएसएफ दक्षिण बंगाल फ्रंटियरने एक मोठे पाऊल उचलत पहिल्यांदाच या दलदलीच्या भागातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेसाठी आणि प्रचंड घनदाट जंगले आणि नद्यांनी वेढलेल्या या दुर्गम भागाच्या सुरक्षेसाठी महिला सशक्तीकरणाचे प्रतीक असलेल्या महिला जवानांना तैनात केले आहे. या भागात पाळत ठेवण्यासाठी अलीकडेच तैनात करण्यात आलेल्या बीएसएफच्या सहा नवीन फ्लोटिंग बीओपींपैकी एक बीओपी गंगा येथील सुरक्षेची जबाबदारी आता पूर्णपणे महिला जवानांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या बीओपीवरून सीमा सुरक्षेची धुरा आता महिलांनी हाती घेतली असून त्या स्वतंत्रपणे लढाऊ भूमिकेत दिसणार आहेत. 

बीएसएफच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सुंदरबनसारख्या अवघड भागात तरंगत्या बीओपीच्या ऑपरेशनसाठी आणि सीमेवर गस्त घालण्यासाठी महिला रक्षकांची एक पलटण तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या तैनातीमुळे महिला घुसखोरांकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी विशेष मदत होणार आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरचे प्रवक्ते आणि डीआयजी अमरीश कुमार आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सुंदरबनसारख्या अवघड भागात सीमेवर गस्त घालण्यासाठी आणि फ्लोटिंग बीओपीच्या ऑपरेशनसाठी महिला जवानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच, सध्या येथे महिला जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे, ज्यात 15 ते 20 जवानांचा समावेश आहे, असे अमरीश कुमार आर्य यांनी सांगितले.

दरम्यान, सुंदरबन प्रदेशाची सुरक्षा हे खूप आव्हानात्मक काम आहे. या भागातून जनावरे व अंमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी बीएसएफ एका मोठ्या जहाजाचे फ्लोटिंग बीओपीमध्ये रूपांतर करून चोवीस तास लक्ष ठेवते. येथे दोन्ही देशांची सीमा रायमंगळ, इछामती अशा अनेक नद्यांमधून जाते, अशा परिस्थितीत जवान अत्यंत कठीण परिस्थितीत येथे कर्तव्य बजावतात.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेशIndiaभारत