शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

भारत-बांगलादेश सीमेवर पहिल्यांदाच महिला गार्ड तैनात, घनदाट जंगलाच्या मध्यभागी शत्रूंशी लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 23:18 IST

घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते. 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भारत आणि बांगलादेशच्या सीमेदरम्यान शेकडो चौरस किलोमीटर पसरलेल्या सुंदरबन क्षेत्राची सुरक्षा हे एक अतिशय आव्हानात्मक काम आहे. या भागातून जनावरे व अंमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते. 

बीएसएफ दक्षिण बंगाल फ्रंटियरने एक मोठे पाऊल उचलत पहिल्यांदाच या दलदलीच्या भागातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेसाठी आणि प्रचंड घनदाट जंगले आणि नद्यांनी वेढलेल्या या दुर्गम भागाच्या सुरक्षेसाठी महिला सशक्तीकरणाचे प्रतीक असलेल्या महिला जवानांना तैनात केले आहे. या भागात पाळत ठेवण्यासाठी अलीकडेच तैनात करण्यात आलेल्या बीएसएफच्या सहा नवीन फ्लोटिंग बीओपींपैकी एक बीओपी गंगा येथील सुरक्षेची जबाबदारी आता पूर्णपणे महिला जवानांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या बीओपीवरून सीमा सुरक्षेची धुरा आता महिलांनी हाती घेतली असून त्या स्वतंत्रपणे लढाऊ भूमिकेत दिसणार आहेत. 

बीएसएफच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सुंदरबनसारख्या अवघड भागात तरंगत्या बीओपीच्या ऑपरेशनसाठी आणि सीमेवर गस्त घालण्यासाठी महिला रक्षकांची एक पलटण तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या तैनातीमुळे महिला घुसखोरांकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी विशेष मदत होणार आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरचे प्रवक्ते आणि डीआयजी अमरीश कुमार आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सुंदरबनसारख्या अवघड भागात सीमेवर गस्त घालण्यासाठी आणि फ्लोटिंग बीओपीच्या ऑपरेशनसाठी महिला जवानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच, सध्या येथे महिला जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे, ज्यात 15 ते 20 जवानांचा समावेश आहे, असे अमरीश कुमार आर्य यांनी सांगितले.

दरम्यान, सुंदरबन प्रदेशाची सुरक्षा हे खूप आव्हानात्मक काम आहे. या भागातून जनावरे व अंमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी बीएसएफ एका मोठ्या जहाजाचे फ्लोटिंग बीओपीमध्ये रूपांतर करून चोवीस तास लक्ष ठेवते. येथे दोन्ही देशांची सीमा रायमंगळ, इछामती अशा अनेक नद्यांमधून जाते, अशा परिस्थितीत जवान अत्यंत कठीण परिस्थितीत येथे कर्तव्य बजावतात.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेशIndiaभारत