शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

भारत-बांगलादेश सीमेवर पहिल्यांदाच महिला गार्ड तैनात, घनदाट जंगलाच्या मध्यभागी शत्रूंशी लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 23:18 IST

घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते. 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भारत आणि बांगलादेशच्या सीमेदरम्यान शेकडो चौरस किलोमीटर पसरलेल्या सुंदरबन क्षेत्राची सुरक्षा हे एक अतिशय आव्हानात्मक काम आहे. या भागातून जनावरे व अंमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते. 

बीएसएफ दक्षिण बंगाल फ्रंटियरने एक मोठे पाऊल उचलत पहिल्यांदाच या दलदलीच्या भागातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेसाठी आणि प्रचंड घनदाट जंगले आणि नद्यांनी वेढलेल्या या दुर्गम भागाच्या सुरक्षेसाठी महिला सशक्तीकरणाचे प्रतीक असलेल्या महिला जवानांना तैनात केले आहे. या भागात पाळत ठेवण्यासाठी अलीकडेच तैनात करण्यात आलेल्या बीएसएफच्या सहा नवीन फ्लोटिंग बीओपींपैकी एक बीओपी गंगा येथील सुरक्षेची जबाबदारी आता पूर्णपणे महिला जवानांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या बीओपीवरून सीमा सुरक्षेची धुरा आता महिलांनी हाती घेतली असून त्या स्वतंत्रपणे लढाऊ भूमिकेत दिसणार आहेत. 

बीएसएफच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सुंदरबनसारख्या अवघड भागात तरंगत्या बीओपीच्या ऑपरेशनसाठी आणि सीमेवर गस्त घालण्यासाठी महिला रक्षकांची एक पलटण तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या तैनातीमुळे महिला घुसखोरांकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी विशेष मदत होणार आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरचे प्रवक्ते आणि डीआयजी अमरीश कुमार आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सुंदरबनसारख्या अवघड भागात सीमेवर गस्त घालण्यासाठी आणि फ्लोटिंग बीओपीच्या ऑपरेशनसाठी महिला जवानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच, सध्या येथे महिला जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे, ज्यात 15 ते 20 जवानांचा समावेश आहे, असे अमरीश कुमार आर्य यांनी सांगितले.

दरम्यान, सुंदरबन प्रदेशाची सुरक्षा हे खूप आव्हानात्मक काम आहे. या भागातून जनावरे व अंमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी बीएसएफ एका मोठ्या जहाजाचे फ्लोटिंग बीओपीमध्ये रूपांतर करून चोवीस तास लक्ष ठेवते. येथे दोन्ही देशांची सीमा रायमंगळ, इछामती अशा अनेक नद्यांमधून जाते, अशा परिस्थितीत जवान अत्यंत कठीण परिस्थितीत येथे कर्तव्य बजावतात.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेशIndiaभारत