शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: 1971नंतर पहिल्यांदाच हवाई दलाची पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 13:00 IST

भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त मोठी कारवाई करत पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हल्ल्याच्या सर्व सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला.

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त मोठी कारवाई करत पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हल्ल्याच्या सर्व सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला. बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैसेचे दहशतवादी तळ हवाई दलाने उद्ध्वस्त केले. मध्यरात्री 3 ते 3.30 दरम्यान मिराज 2000 विमानांनी धडाकेबाज कारवाई केली.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला 10 पेक्षा अधिक दिवस उलटून गेले असताना भारतीय हवाई दलाने केलेली कारवाई अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. 1971 नंतर प्रथमच हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कारवाई केली. गेल्या 47 वर्षांमध्ये हवाई दलाने अशा प्रकारची कारवाई करुन दाखवली. याआधी 1971 च्या युद्धावेळी भारताने अशी कारवाई केली होती. या कारवाईत जैशचे टॉप कमांडर आणि ट्रेनर मारले गेल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी दिली.

2016 मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. मात्र त्यावेळी असा कोणत्याच प्रकारचा हल्ला झाला नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पाकिस्तानने दिलेली प्रतिक्रिया अगदी उलट आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराच्या कारवाईचा इन्कार करणाऱ्या पाकिस्तानने यावेळी स्वतःच या हल्ल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. 8 वाजून 36 मिनिटांनी पाकिस्तानने अधिकृतपणे व्हिडीओ जारी केला. 

खैबर पख्तुन प्रांतात भारतीय हवाई दलाने कारवाई अतिशय धाडसी होती. पाकिस्तानला दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव होता. त्यामुळे पुलवामातील हल्ल्यानंतर लगेचच सीमेजवळील दहशतवाद्यांचे तळ हटवण्यात आले. अशी कारवाई होऊ शकते, यासाठी पाकिस्तानही सज्ज होता. त्यामुळेच खैबर पख्तुनमध्ये 12 मिराज 2000 विमानांनी केलेल्या कारवाईसाठी तिथल्या काही डीप असेट्सची मदत घेण्यात आली. यासाठी आग्रा आणि बरेलीच्या विमानतळांचा वापर करण्यात आला.

रात्रीच्या वेळी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून कारवाई करणं आव्हानात्मक होतं. पाकिस्तानच्या एफ-16 विमानांकडून प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शक्य तितक्या कमी वेळात ही कारवाई पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यामुळे अवघ्या 20 ते 30 मिनिटांमध्ये भारतीय हवाई दलाच्या शूर वैमानिकांनी कारवाई पूर्ण केली. यावेळी पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी कारवाईसाठी उड्डाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र भारताची कारवाई इतकी वेगवान होती की, पाकिस्तानच्या विमानांनी उड्डाण करण्याआधीच भारतीय विमानं अगदी सुरक्षितपणे माघारी परतली.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला