शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: 1971नंतर पहिल्यांदाच हवाई दलाची पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 13:00 IST

भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त मोठी कारवाई करत पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हल्ल्याच्या सर्व सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला.

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त मोठी कारवाई करत पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हल्ल्याच्या सर्व सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला. बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैसेचे दहशतवादी तळ हवाई दलाने उद्ध्वस्त केले. मध्यरात्री 3 ते 3.30 दरम्यान मिराज 2000 विमानांनी धडाकेबाज कारवाई केली.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला 10 पेक्षा अधिक दिवस उलटून गेले असताना भारतीय हवाई दलाने केलेली कारवाई अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. 1971 नंतर प्रथमच हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कारवाई केली. गेल्या 47 वर्षांमध्ये हवाई दलाने अशा प्रकारची कारवाई करुन दाखवली. याआधी 1971 च्या युद्धावेळी भारताने अशी कारवाई केली होती. या कारवाईत जैशचे टॉप कमांडर आणि ट्रेनर मारले गेल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी दिली.

2016 मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. मात्र त्यावेळी असा कोणत्याच प्रकारचा हल्ला झाला नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पाकिस्तानने दिलेली प्रतिक्रिया अगदी उलट आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराच्या कारवाईचा इन्कार करणाऱ्या पाकिस्तानने यावेळी स्वतःच या हल्ल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. 8 वाजून 36 मिनिटांनी पाकिस्तानने अधिकृतपणे व्हिडीओ जारी केला. 

खैबर पख्तुन प्रांतात भारतीय हवाई दलाने कारवाई अतिशय धाडसी होती. पाकिस्तानला दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव होता. त्यामुळे पुलवामातील हल्ल्यानंतर लगेचच सीमेजवळील दहशतवाद्यांचे तळ हटवण्यात आले. अशी कारवाई होऊ शकते, यासाठी पाकिस्तानही सज्ज होता. त्यामुळेच खैबर पख्तुनमध्ये 12 मिराज 2000 विमानांनी केलेल्या कारवाईसाठी तिथल्या काही डीप असेट्सची मदत घेण्यात आली. यासाठी आग्रा आणि बरेलीच्या विमानतळांचा वापर करण्यात आला.

रात्रीच्या वेळी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून कारवाई करणं आव्हानात्मक होतं. पाकिस्तानच्या एफ-16 विमानांकडून प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शक्य तितक्या कमी वेळात ही कारवाई पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यामुळे अवघ्या 20 ते 30 मिनिटांमध्ये भारतीय हवाई दलाच्या शूर वैमानिकांनी कारवाई पूर्ण केली. यावेळी पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी कारवाईसाठी उड्डाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र भारताची कारवाई इतकी वेगवान होती की, पाकिस्तानच्या विमानांनी उड्डाण करण्याआधीच भारतीय विमानं अगदी सुरक्षितपणे माघारी परतली.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला