शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:11 IST

Rajasthan Crime News: राजस्थानमधील बाडमेर येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं अशा चार जणांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.

राजस्थानमधील बाडमेर येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं अशा चार जणांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. ही हृदयद्रावक घटना  शिव ठाणे क्षेत्रातील उंडू गावातील ब्राह्मणांची ढाणी येथे मंगळवारी संघ्याकाळी घडली.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावं शिवलाल (३५), त्यांची पत्नी कविता (३२), आणि त्यांची दोन मुलं यांचा समावेश आहे. या मुलांची नावं बजरंग आणि रामदेव अशी असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवलाल याने आधी आपल्या घराला कुलूप लावलं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबासह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी मारली. शिवलाल याच्या धाकट्या भावाने त्याला अनेकदा फोल लावल्यानंतरही तो उचलला गेला नाही. त्यानंतर त्याने शेजारी आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी शिवलाल यांची पत्नी कविता यांनी त्यांचा मुलगा रामदेव याला नववधूसारखं सजवलं होतं. एवढंच नाही तर त्याला खूप दागिने घातले. तसेच त्याच्या डोक्यावर पदर ठेवला, डोळ्यांना काजळही लावलं. एवढा शृंगार झाल्यानंतर नववधूप्रमाणे लाजणाऱ्या रामदेव याचे खूप फोटोही काढले. त्यानंतर शिवलाल मेघवाल आणि कविता या जोडप्याने बजरंग आणि रामदेव या मुलांसह पाण्याच्या टाकीत उडी मारली. त्यांचे मृतदेह घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये तरंगताना दिसून आले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक मानाराम गर्ग यांनी सांगितले की, या चौघांचे मृतदेह हे मंगळवारी संध्याकाळी पाण्याच्या टाकीत सापडले. मृत कविता हिच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत मृतहेद बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, मृत कविता हिचे काका गोपीलाल यांनी सांगितले की, शिवलाल हे प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत मिळालेल्या पैशांमधून वेगळं घर बांधू इश्चित होते. मात्र त्यांचा भाऊ आणि आईचा त्यांना विरोध होता. या कौटुंबिक तणावामुळे ते त्रस्त होते. तसेच त्यांनी २९ जून रोजीसुद्धा जीवन संपवण्याच्या इराद्यान एक चिठ्ठी लिहिली होती. मात्र त्यावेळी त्यांनी तो निर्णय टाळला होता. मात्र अखेरीस त्यांनी जीवन संपवले. दरम्यान, आता पोलीस शिवलाल आणि कविता यांच्या नातेवाईकांची चौकशी करून पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान