शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:11 IST

Rajasthan Crime News: राजस्थानमधील बाडमेर येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं अशा चार जणांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.

राजस्थानमधील बाडमेर येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं अशा चार जणांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. ही हृदयद्रावक घटना  शिव ठाणे क्षेत्रातील उंडू गावातील ब्राह्मणांची ढाणी येथे मंगळवारी संघ्याकाळी घडली.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावं शिवलाल (३५), त्यांची पत्नी कविता (३२), आणि त्यांची दोन मुलं यांचा समावेश आहे. या मुलांची नावं बजरंग आणि रामदेव अशी असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवलाल याने आधी आपल्या घराला कुलूप लावलं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबासह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी मारली. शिवलाल याच्या धाकट्या भावाने त्याला अनेकदा फोल लावल्यानंतरही तो उचलला गेला नाही. त्यानंतर त्याने शेजारी आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी शिवलाल यांची पत्नी कविता यांनी त्यांचा मुलगा रामदेव याला नववधूसारखं सजवलं होतं. एवढंच नाही तर त्याला खूप दागिने घातले. तसेच त्याच्या डोक्यावर पदर ठेवला, डोळ्यांना काजळही लावलं. एवढा शृंगार झाल्यानंतर नववधूप्रमाणे लाजणाऱ्या रामदेव याचे खूप फोटोही काढले. त्यानंतर शिवलाल मेघवाल आणि कविता या जोडप्याने बजरंग आणि रामदेव या मुलांसह पाण्याच्या टाकीत उडी मारली. त्यांचे मृतदेह घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये तरंगताना दिसून आले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक मानाराम गर्ग यांनी सांगितले की, या चौघांचे मृतदेह हे मंगळवारी संध्याकाळी पाण्याच्या टाकीत सापडले. मृत कविता हिच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत मृतहेद बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, मृत कविता हिचे काका गोपीलाल यांनी सांगितले की, शिवलाल हे प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत मिळालेल्या पैशांमधून वेगळं घर बांधू इश्चित होते. मात्र त्यांचा भाऊ आणि आईचा त्यांना विरोध होता. या कौटुंबिक तणावामुळे ते त्रस्त होते. तसेच त्यांनी २९ जून रोजीसुद्धा जीवन संपवण्याच्या इराद्यान एक चिठ्ठी लिहिली होती. मात्र त्यावेळी त्यांनी तो निर्णय टाळला होता. मात्र अखेरीस त्यांनी जीवन संपवले. दरम्यान, आता पोलीस शिवलाल आणि कविता यांच्या नातेवाईकांची चौकशी करून पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान