शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आत्मनिर्भरतेचं पहिलं पाऊल... गृहमंत्री अमित शहांकडून 'स्वदेशी'च्या वापराचा आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:59 IST

गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. देशातील नागरिकांना स्वदेशी म्हणजे देशात बनणाऱ्या वस्तूंचाच सर्वाधिक वापर करावा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला. आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेनं स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के एवढे आहे, असे मोदींनी सांगितले. त्यानंतर, गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. देशातील नागरिकांना स्वदेशी म्हणजे देशात बनणाऱ्या वस्तूंचाच सर्वाधिक वापर करावा, तसेच इतरांनाही स्वेदशीचं महत्त्व पटवून देत त्यांनाही याच वस्तुंच्या वापराचा आग्रह करावा, असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच, जर प्रत्येक भारतीय नागरिकाने भारतात बनणाऱ्या स्वदेशी वस्तूंच्या वापराचा संकल्प केल्यास, पुढील ५ वर्षात देशातील लोकशाही आत्मनिर्भर म्हणजेच स्वावलंबी बनू शकते, असा मूलमंत्रच शहा यांनी दिला आहे. 

अमित शहा यांनी देशावासीयांना स्वदेशीचा नारा देतानाच, आत्मनिर्भरतेचं पहिलं पाऊल टाकलं आहे. देशातील केंद्रीय सशस्त्र दलाच्या सर्वच कँटींग आणि स्टोअर्समध्ये केवळ स्वदेशी वस्तूंचीच विक्री करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. १ जून २०२० पासून देशातील सर्वच सीएपीएफ कँटीनसाठी हा आदेश लागू असणार आहे. ज्याची एकूण खरेदी साधारणत: २८०० कोटी रुपये एवढी आहे. या निर्णयामुळे १० लाख सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे ५० लाख नातेवाईक स्वेदशीचा वापर करतील, असे अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे. 

 

दरम्यान, आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, आम्हाला या काळाने शिकवले आहे की, लोकलला (स्थानिक) आपला जीवनमंत्र बनवावाच लागेल. आपल्याला जे काही ग्लोबल ब्रांड लागतात, तेही कधी तरी असेच लोकल होते. जेव्हा तेथील लोकांनी त्याचा वापर सुरू केला व प्रचार केला तेव्हा ते लोकलच होते. त्यांचे ब्रांडिंग केले गेले. त्यांच्याबाबत अभिमान बाळगला गेला तेव्हा तर ते लोकलपासूल ग्लोबल झाले. त्यामुळे आज प्रत्येक भारतीयाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनले पाहिजे. तुम्ही केवळ लोकल प्रॉडक्टच खरेदी करून भागणार नाही तर त्याचा अभिमानही बाळगला पाहिजे. तुमच्या प्रयत्नांनी तर तुमच्यावरील माझी श्रद्धा आणखी वाढली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMumbaiमुंबईHome Ministryगृह मंत्रालयIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिस