शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गोमांस बाळगणाऱ्या व्यक्तीला ठार मारणाऱ्या 11 जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 8:15 PM

गोमांस बाळगल्याच्या संशयातून लोकांना ठार मारणाऱ्या एखाद्या जमावाला न्यायालयाने शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

नवी दिल्ली: गोमांस बाळगल्याप्रकरणी जमावाकडून मारहाण झाल्याच्या अनेक घटना मध्यंतरी सातत्याने कानावर पडत होत्या. याप्रकरणी बुधवारी झारखंडमधील जलद गती न्यायालयाने (फास्ट ट्रॅक) महत्त्वपूर्ण निकाल दिला. गेल्यावर्षी जून महिन्यात झारखंडच्या रामगढ येथे अलिमुद्दीन अन्सारी (55) यांना गोमांस बाळगल्याप्रकरणी जमावाने ठार मारले होते. याप्रकरणी आज न्यायालयाने खटल्यातील 12 दोषी आरोपींपैकी 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गोमांस बाळगल्याच्या संशयातून लोकांना ठार मारणाऱ्या एखाद्या जमावाला न्यायालयाने शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या निकालामुळे भविष्यात अशा घटनांना चाप बसू शकतो. निकालानंतर दोषींना कोर्टाबाहेर आणताना जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्याचंही वृत्त आहे. या निर्णयाविरोधात झारखंड उच्च न्यायालयात जाणार असल्याचं दोषींच्या वकिलांनी सांगितले. जलदगती न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश ओम प्रकाश यांनी हा निकाल दिला. त्यांनी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर दोषींना जन्मठेप सुनावली. तसेच जिल्हा कायदा नियामक यंत्रणेला पीडिताच्या कुटंबीयांना योग्य तो मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश दिले. गेल्यावर्षी जून महिन्यात रामगढमधील अलिमुद्दीन अन्सारी (55) यांना गाडीतून गोमांसाची वाहतूक केल्याच्या संशयावरून गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. यामध्ये अन्सारी यांचा मृत्यू झाला होता. जमावाने अन्सारी यांची गाडीही पेटवून दिली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. 

टॅग्स :beefगोमांसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी