शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आधी बलात्कार, मग महिलेला जिंवंत जाळलं! मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांची दहशत, 17 घरांना लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 13:53 IST

या हल्ल्यात हल्लेखोरांनी 17 घरे जाळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पीडितेवर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली आहे...

मणिपूरमधील जिरिबाम जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे गुरुवारी (7 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास एका 31 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याचे वृत्त आहे. यावेळी सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार करत लुटालूट आणि जाळपोळ केली. या हल्ल्यात हल्लेखोरांनी 17 घरे जाळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पीडितेवर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी संबंधित एफआयआरमध्ये, "वांशिक आणि सामुदायिक धरतीवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा" उल्लेख केला आहे. पीडितेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल करत म्हटले आहे की, हे कृत्य अवैध घुसखोरांकडून करण्यात आले आहे. मात्र, अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. तसेच, पोलिसांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मणिपुरातील स्थानीय भागातील असल्याचे म्हटले आहे.

हल्लेखोरांची दहशत - स्थानिक आदिवासी वकिल समितीने (ITAC) एक निवेदन जारी केले आहे. यात, "हल्लेखोरांनी गावात प्रवेश करताच घरांना आग लावली आणि गोळीबार सुरू केला. यावेळी गावातील लोक जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळू लागले, मात्र एक महिला अडकली आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. 

आदिवासी संघटनांकडून केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी -या घटनेनंतर आदिवासी संघटनांकडून मणिपूरमधील कुकी-झोमी-हमार समुदायांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्या आली आहे. याशिवाय, चुरचंदपूर येथील आदिवासी संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमनेही या प्रकरणातील गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस