शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

आधी मनीष तिवारी, आता शशी थरुर; प्रियंका गांधींनी दूर केली या दिग्गज नेत्यांची नाराजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:35 IST

काँग्रेस खासदार मनीष तिवारी आणि खासदार शशी थरुर हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

Congress: मनीष तिवारी आणि शशी थरुर हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणले जातात. तिवारी हे चंदीगडचे खासदार आहेत, तर थरूर केरळच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.या दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. मात्र, काही काळापासून दोघेही पक्षाच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

ऑपरेशन सिंदूरवर देशाचे बाजू मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या खासदारांमध्ये तिवारी आणि थरुर यांचाही समावेश होता. पण, संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची वेळ आली, तेव्हा काँग्रेसने या दोन्ही नेत्यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. मात्र, अलिकडेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर प्रियांकांनी दोघांची नाराजी दूर केली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आधी तिवारी, नंतर थरूर यांची भेट

वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी राजकीयदृष्ट्या खूप सक्रिय आहेत. त्या लोकसभेत सरकारवर सातत्याने हल्लाबोल करतात. ऑपरेशन सिंदूरवरील भाषणात तर त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याशिवाय, त्या पक्षातील नाराज नेत्यांची समजूनत काढताना दिसत आहेत. २९ जुलै रोजी मनीष तिवारी आणि प्रियंका यांच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला होता, तर आता शशी थरुर यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. 

प्रियांका आणि मनीष तिवारी यांची भेट संसदेच्या आवारात झाली. प्रियांका संसदेच्या आत जात असताना, त्या तिवारी यांना भेटताना दिसल्या. दोघांमध्ये काही सेकंदाची चर्चाही झाली. तर, बुधवारी थरुर यांना भेटतानाचा फोटो समोर आला. फोटो पाहता असे दिसते की, दोघांची ही भेट संसद भवनातील आहे. त्यांच्यासोबत इतर काही नेतेही दिसत आहेत. यावरुनच प्रियंका गांधींनी दोन्ही नेत्यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.

तिवारी संसदेत बोलू इच्छित होते!मनीष तिवारी ऑपरेशन सिंदूरवर संसदेत बोलू इच्छित होते. त्यांनी पक्षाला एक पत्रही लिहिले होते, ज्यामध्ये चर्चेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. काँग्रेसने लोकसभेतील पक्षाचे नेते गौरव गोगोई आणि खासदार कोडिकुनिल सुरेश यांच्यामार्फत थरुर यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी नकार दिला आणि त्याऐवजी भारतीय बंदरे विधेयक, २०२५ वर बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल शशी थरुर यांना बोलण्याची संधी न दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. लोकसभेत थरूर यांचे नाव न घेता ते म्हणाले की, आपले शिष्टमंडळ परदेशात भारताची बाजू जोरदारपणे मांडत होते, परंतु काही वरिष्ठ काँग्रेस नेते यामुळे दुखावले आहेत. हेच कारण आहे की, काही काँग्रेस नेत्यांना सभागृहात बोलू दिले गेले नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीShashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीOperation Sindoorऑपरेशन सिंदूर