शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

आधी मनीष तिवारी, आता शशी थरुर; प्रियंका गांधींनी दूर केली या दिग्गज नेत्यांची नाराजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:35 IST

काँग्रेस खासदार मनीष तिवारी आणि खासदार शशी थरुर हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

Congress: मनीष तिवारी आणि शशी थरुर हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणले जातात. तिवारी हे चंदीगडचे खासदार आहेत, तर थरूर केरळच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.या दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. मात्र, काही काळापासून दोघेही पक्षाच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

ऑपरेशन सिंदूरवर देशाचे बाजू मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या खासदारांमध्ये तिवारी आणि थरुर यांचाही समावेश होता. पण, संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची वेळ आली, तेव्हा काँग्रेसने या दोन्ही नेत्यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. मात्र, अलिकडेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर प्रियांकांनी दोघांची नाराजी दूर केली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आधी तिवारी, नंतर थरूर यांची भेट

वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी राजकीयदृष्ट्या खूप सक्रिय आहेत. त्या लोकसभेत सरकारवर सातत्याने हल्लाबोल करतात. ऑपरेशन सिंदूरवरील भाषणात तर त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याशिवाय, त्या पक्षातील नाराज नेत्यांची समजूनत काढताना दिसत आहेत. २९ जुलै रोजी मनीष तिवारी आणि प्रियंका यांच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला होता, तर आता शशी थरुर यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. 

प्रियांका आणि मनीष तिवारी यांची भेट संसदेच्या आवारात झाली. प्रियांका संसदेच्या आत जात असताना, त्या तिवारी यांना भेटताना दिसल्या. दोघांमध्ये काही सेकंदाची चर्चाही झाली. तर, बुधवारी थरुर यांना भेटतानाचा फोटो समोर आला. फोटो पाहता असे दिसते की, दोघांची ही भेट संसद भवनातील आहे. त्यांच्यासोबत इतर काही नेतेही दिसत आहेत. यावरुनच प्रियंका गांधींनी दोन्ही नेत्यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.

तिवारी संसदेत बोलू इच्छित होते!मनीष तिवारी ऑपरेशन सिंदूरवर संसदेत बोलू इच्छित होते. त्यांनी पक्षाला एक पत्रही लिहिले होते, ज्यामध्ये चर्चेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. काँग्रेसने लोकसभेतील पक्षाचे नेते गौरव गोगोई आणि खासदार कोडिकुनिल सुरेश यांच्यामार्फत थरुर यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी नकार दिला आणि त्याऐवजी भारतीय बंदरे विधेयक, २०२५ वर बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल शशी थरुर यांना बोलण्याची संधी न दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. लोकसभेत थरूर यांचे नाव न घेता ते म्हणाले की, आपले शिष्टमंडळ परदेशात भारताची बाजू जोरदारपणे मांडत होते, परंतु काही वरिष्ठ काँग्रेस नेते यामुळे दुखावले आहेत. हेच कारण आहे की, काही काँग्रेस नेत्यांना सभागृहात बोलू दिले गेले नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीShashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीOperation Sindoorऑपरेशन सिंदूर