शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पाण्यासाठी घरातच भांडण, सासू-सासऱ्यांनी सुनेला जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 16:35 IST

तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे आपण नेहमीच ऐकतो किंवा चर्चा करताना म्हणतोही

भोपाळ - मध्य प्रदेशातील बैतुल येथे यंदाही दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तर, येथील एका कुटुंबात पाण्यासाठी मोठं भांडण झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पाण्यावरुन झालेल्या भांडणात या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या सुनेलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित महिला 90 टक्के भाजली आहे. महिलेस भोपाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे आपण नेहमीच ऐकतो किंवा चर्चा करताना म्हणतोही. मात्र, भोपाळच्या बैतुल येथील कलह जण भविष्यातील या घटनेची आत्ताच साक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. बडेरा येथील रहिवासी असलेल्या साहू कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून भांडण सुरू आहे. या कुटुंबात जमिनीच्या वाटणी झाल्या आहेत. त्यानुसार, कुटुंबातील राजेश यांच्या वाट्याला आलेल्या जमिनीत सैफ्टिक टँक आहे. तर कुटुंबीयांच्या वाट्याला आलेल्या जमिनीत हँडपंप म्हणजे हापसाही आहे. या हापस्यावर पाणी भरण्यासाठी कुटुंबातील सदस्य आल्यानंतर येथे भांडण होत. कुटुंबातील सदस्यांनी राजेश आणि त्याच्या पत्नीला या हापशावरुन पाणी भरण्यास मनाई केली होती. गुरुवारी कुटुंबातील सदस्यांनी राजेशच्या पत्नीसोबत याच कारणावरुन भांडण केले. त्यावेळी रॉकेल ओतून राजेशची पत्नी द्वारका हिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी द्वारकाच्या फिर्यादीवरुन सासूर-सासऱ्यासह कुटुंबातील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुदैवाने पत्नी द्वारकाच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून पती राजेश आणि तिच्या मुलीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, द्वारकाला लपेटलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, द्वारकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेत द्वारक 90 टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांनी सासू-सासरे, दीर-भावजय आणि चुलत सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.     

टॅग्स :fireआगWaterपाणीbhopal-pcभोपाळ