शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Kolkata Railway Building Fire: कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 10:17 IST

Kolkata Railway Building Fire: या आगीत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीमध्ये पूर्व रेल्वेचे (Eastern Railway) विभागीय कार्यालय आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोलकाता: कोलकाता येथील स्ट्रँड रोड (Strand Road) परिसरात असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या 13 व्या मजल्यावर सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीमध्ये पूर्व रेल्वेचे (Eastern Railway) विभागीय कार्यालय आहे. मृतांमध्ये रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.(Fire breaks out on the 13th floor of a multi- storey building at Strand road in Kolkata)

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आगीची घटना सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. पूर्व रेल्वेचे प्रवक्ता कमल देव यांनी सांगितले की, न्यू कोयलाघाट इमारतीत (New Koilaghat building) आग लागली. यामध्ये पूर्व रेल्वेचे आणि दक्षिण-पूर्व रेल्वेचे क्षेत्रिय कार्यालय आहे. तसेच, इमारतीच्या तळमजल्यावर कॅम्प्युटराइज्ड तिकीट बुकिंग केंद्र आहे. आग लागल्यामुळे तिकीट बुकिंग प्रकियेवर परिणाम झाला आहे.

आग लागल्याचे समजल्यानंतर सुरक्षा कर्मचारी तातडीने 13व्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी बहुतांश कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. साधारण साडेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान इमारतीमध्ये आले. ही आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी रेल्वे अधिकारी पार्था सारथी मंडल आणि एस सहनी या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, स्ट्रँड रोडवरील न्यू कोयलाघाट इमारतीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये चार अग्निशमन कर्मचारी, हरे स्ट्रीट पोलीस ठाण्यात तैनात असलेले सहायक उपनिरीक्षक आणि आरपीएफचा एक जवान असल्याचे अग्निशमन व आपत्कालीन सेवामंत्री सुजित बसू यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेशआगीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत रेल्वे व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. आम्ही या सगळ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालfireआगrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलMamata Banerjeeममता बॅनर्जी