शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

'उल्टा चोर चौकीदार को डाँटे', अखेरच्या भाषणात मोदींकडून विरोधकांना कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 19:06 IST

सध्याची विरोधकांची टीका म्हणजे 'उल्टा चोर चौकीदार को डाँटे', असेच असल्याचं मोदींनी म्हटलं.  

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवडणुकांपूर्वीचे शेवटचे भाषण केले. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीतील हे शेवटचे अधिवेशन होते. या अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 16 लोकसभेतील मोदींचे हे शेवटचे भाषण होते. या भाषणात मोदींनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. गेल्या 4.5 वर्षात मोदी सरकारने देशात केलेल्या प्रगतीचा पाढा मोदींनी वाचला. तसेच, मोदींना वाईट म्हणा, भाजपाला वाईट म्हणा, पण हे करता करता देशाला वाईट म्हणू नका, असे म्हणत मोदींनी विरोधकांना टार्गेट केलं. तसेच, सध्याची विरोधकांची टीका म्हणजे 'उल्टा चोर चौकीदार को डाँटे', असेच असल्याचं मोदींनी म्हटलं.  

आता लोकांमध्ये जाऊन आम्ही केलेल्या कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणार आहोत. देशातील कोट्यवधी तरुणांचा मी आभारी आहे, जे यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत. देशातील संसदीय लोकशाही प्रणालीची ते घटक बनत आहेत. त्यासोबतच, एका हलक्या-फुलक्या वातावरणातील निवडणुकांसाठी मी सर्वांनाच शुभेच्छा देतो, असे मोदींनी म्हटले. 

आव्हानांना जे घाबरतात, ते नवीन समस्या निर्माण करतात. आव्हानांना आव्हान देण्याचं काम आम्ही करत आहोत. लोकसभेत 1947 ते 2014 एवढचं मी आज ऐकलं. बीसी म्हणजे बिफोर कॉन्ग्रेस आणि एडी म्हणजे एफ्टर, असाच प्रकार आहे. काँग्रेसपूर्वी आणि काँग्रेसनंतरच देश असंच विरोधकांचा म्हणणं असल्याचे मोदींनी म्हटले. तर, देश गेल्या 55 महिन्यात मोठ्या प्रगतीपथावर असल्याचं मोदींनी सांगितलं. भारताची अर्थव्यवस्था आज देशात 6 व्या क्रमांकावर आहे. काही वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. इंटरनेट डेटा सर्वात स्वस्त अन् वापर जगभरात सर्वाधिक प्रमाणात भारतात होत असल्याचंही मोदींनी सांगितल. तसेच साडे चार वर्षात 10 कोटी शौचालय बांधले, 55 महिन्यात 50 टक्के बँक खाती, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याच काम केल्याचंही मोदींनी सांगितलं. दरम्यान, महागठबंधन म्हणजे महामिलावट असल्याचा आरोपही मोदींनी केला.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : - 

काँग्रेसमध्ये प्रवेश करणे म्हणजे आत्महत्या करणे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय

देशातील वायूसेना दुबळी राहावी, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न, त्यामुळेच राफेल प्रकरणावर फिजूल चर्चा

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाकण्याचं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. 

काँग्रेसमुक्त भारत ही केवळ माझी नाही, तर महात्मा गांधींची इच्छा होती, 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाPMRDAपीएमआरडीएdelhiदिल्ली