शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

'उल्टा चोर चौकीदार को डाँटे', अखेरच्या भाषणात मोदींकडून विरोधकांना कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 19:06 IST

सध्याची विरोधकांची टीका म्हणजे 'उल्टा चोर चौकीदार को डाँटे', असेच असल्याचं मोदींनी म्हटलं.  

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवडणुकांपूर्वीचे शेवटचे भाषण केले. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीतील हे शेवटचे अधिवेशन होते. या अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 16 लोकसभेतील मोदींचे हे शेवटचे भाषण होते. या भाषणात मोदींनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. गेल्या 4.5 वर्षात मोदी सरकारने देशात केलेल्या प्रगतीचा पाढा मोदींनी वाचला. तसेच, मोदींना वाईट म्हणा, भाजपाला वाईट म्हणा, पण हे करता करता देशाला वाईट म्हणू नका, असे म्हणत मोदींनी विरोधकांना टार्गेट केलं. तसेच, सध्याची विरोधकांची टीका म्हणजे 'उल्टा चोर चौकीदार को डाँटे', असेच असल्याचं मोदींनी म्हटलं.  

आता लोकांमध्ये जाऊन आम्ही केलेल्या कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणार आहोत. देशातील कोट्यवधी तरुणांचा मी आभारी आहे, जे यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत. देशातील संसदीय लोकशाही प्रणालीची ते घटक बनत आहेत. त्यासोबतच, एका हलक्या-फुलक्या वातावरणातील निवडणुकांसाठी मी सर्वांनाच शुभेच्छा देतो, असे मोदींनी म्हटले. 

आव्हानांना जे घाबरतात, ते नवीन समस्या निर्माण करतात. आव्हानांना आव्हान देण्याचं काम आम्ही करत आहोत. लोकसभेत 1947 ते 2014 एवढचं मी आज ऐकलं. बीसी म्हणजे बिफोर कॉन्ग्रेस आणि एडी म्हणजे एफ्टर, असाच प्रकार आहे. काँग्रेसपूर्वी आणि काँग्रेसनंतरच देश असंच विरोधकांचा म्हणणं असल्याचे मोदींनी म्हटले. तर, देश गेल्या 55 महिन्यात मोठ्या प्रगतीपथावर असल्याचं मोदींनी सांगितलं. भारताची अर्थव्यवस्था आज देशात 6 व्या क्रमांकावर आहे. काही वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. इंटरनेट डेटा सर्वात स्वस्त अन् वापर जगभरात सर्वाधिक प्रमाणात भारतात होत असल्याचंही मोदींनी सांगितल. तसेच साडे चार वर्षात 10 कोटी शौचालय बांधले, 55 महिन्यात 50 टक्के बँक खाती, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याच काम केल्याचंही मोदींनी सांगितलं. दरम्यान, महागठबंधन म्हणजे महामिलावट असल्याचा आरोपही मोदींनी केला.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : - 

काँग्रेसमध्ये प्रवेश करणे म्हणजे आत्महत्या करणे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय

देशातील वायूसेना दुबळी राहावी, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न, त्यामुळेच राफेल प्रकरणावर फिजूल चर्चा

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाकण्याचं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. 

काँग्रेसमुक्त भारत ही केवळ माझी नाही, तर महात्मा गांधींची इच्छा होती, 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाPMRDAपीएमआरडीएdelhiदिल्ली