शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

धक्कादायक! आठवीतील 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 10:22 IST

देशभरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 56%  विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच 27% मुलांना साधं वाचताही येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

ठळक मुद्देदेशभरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नसल्याचीमाहिती आता समोर आली आहे. 27% मुलांना साधं वाचताही येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इयत्ता तिसरीच्या 70 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नसल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने नवनवीन योजना आखल्या जात असतात. मात्र देशभरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच 27% मुलांना साधं वाचताही येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेच्या सर्व्हेक्षणात ही माहिती उघड झाली आहे. 'प्रथम' च्या रिपोर्टनुसार, इयत्ता आठवीत शिकणारे 56 टक्के विद्यार्थी तीन अंकी संख्येला एका अंकी संख्येने भागू शकले नाहीत. तर, इयत्ता पाचवीच्या 72 टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच जमत नाही. इयत्ता तिसरीच्या 70 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नसल्याचं समोर आलं आहे.

 दहा वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती याची तुलना केली असता आत्ताची स्थिती अधिक वाईट असल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. 2008 मध्ये इयत्ता पाचवीच्या 37 टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत होतं. आता मात्र ही संख्या 28 टक्क्यांहून कमी झाली आहे. तर 2016 मध्ये ही संख्या 26 टक्क्यांपर्यंत घसरली होती. तसेच अनेक विद्यार्थी व्यवस्थित वाचूही शकत नसल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील प्रत्येक 4 विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी वाचन जमत नसल्याच्या कारणावरून इयत्ता आठवीनंतर शिक्षण सोडून देतो, अशी माहितीही पुढे आली आहे. 

गणितामध्ये मुली या मुलांच्या खूपच मागे आहेत. फक्त 44 टक्के मुलींना भागाकार करता येतो, तर भागाकार करता येणाऱ्या मुलांची संख्या 50 टक्के इतकी आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हा आकडा उलटा आहे. या राज्यांमध्ये भागाकार करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेने ही आकडेवारी 28 राज्यांमधील विविध 596 जिल्ह्यांमधून गोळा केली आहे.यामध्ये 3 ते 16 वयोगटातील मुलांचा समावेश होता. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी