शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

एका भयंकर व्यक्तीने राहुल गांधींना अजून मजबूत केलं, सोनिया गांधींची नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 12:33 IST

'राहुल गांधीने लहानपणापासून खूप सोसलं आहे. त्याने राजकारणात आल्यावर अशा भयंकर व्यक्तीचा सामना केला ज्याने त्याला अजून निर्भय आणि मजबूत केलं', असं म्हणत काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.

ठळक मुद्देराहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतलीकार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केलीयावेळी इंदिरा गांधीबद्दल बोलताना त्या भावूक झालेल्या दिसल्या

नवी दिल्ली - 'राहुल गांधीने लहानपणापासून खूप सोसलं आहे. त्याने राजकारणात आल्यावर अशा भयंकर व्यक्तीचा सामना केला ज्याने त्याला अजून निर्भय आणि मजबूत केलं', असं म्हणत काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतली आहेत.  काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सांगितलं. तसंच भाजपा सरकारवरही जोरदार टीका केली. 

'राहुल गांधी माझा मुलगा असल्याने त्याचं कौतुक करणं चुकीचं ठरेल. लहानपाणासून त्याने दुख: सोसलं आहे. राहुलने राजकारणात आल्यावर अशा भयंकर व्यक्तीचा सामना केला ज्याने त्याला अजून निर्भय आणि मजबूत केलं आहे. मला त्याच्या सहनशीलतेचा गर्व वाटतो. मला पुर्ण विश्वास आहे की पक्षाचं नेतृत्व तो योग्य पद्धतीने करेल', असा विश्वास सोनिया गांधींनी व्यक्त केला. 

20 वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेताना माझे हात थरथरत होते अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. 'ज्या कुटुंबात मी आले ते एक क्रांतिकारी कुटुंब होतं. इंदिरा गांधी त्याच कुटुंबाच्या सदस्य होत्या. इंदिरा गांधींनी मला मुलीप्रमाणे वागवलं.  भारताच्या संस्कृतीशी ओळख करुन दिली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आई दुरावल्याची माझी भावना होती. त्यानंतर माझं आयुष्य पालटलं', हे सांगताना सोनिया गांधी भावूक झाल्या होत्या. यादरम्यान फटाक्यांच्या आवाजामुळे दोन वेळा सोनिया गांधींना भाषण थांबवावं लागलं. 

'इंदिरांच्या हत्येनंतर सात वर्षांनी माझ्या पतीचीही हत्या झाली, माझा आधार माझ्यापासून हिसकावला. पक्ष अडचणीत असल्याने मला पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज ऐकू आला. आपलं कर्तव्य समजत मी राजकारणात आले', असं त्या म्हणाल्या.

'मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी आमच्याकडे फक्त 3 राज्य होती, केंद्राची सत्ता दूर होती. पण नंतर आम्ही डझनपेक्षा जास्त राज्यात सत्ता मिळवली. जेवढं मोठं आव्हान आज आपल्यासमोर आहे, तेवढं कधीच नव्हतं. आव्हानं खूप आहेत, पण आम्ही घाबरणारे नाहीत, झुकणारे नाहीत', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा