शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बापरे! अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून बेपत्ता झाली होती महिला कॉन्स्टेबल अन् आता....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 12:55 IST

female constable raipur police missing for 9 months selling flowers vrindavan : अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून एक महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाली होती. मात्र आता अचानक ती फुलांची विक्री करताना सापडली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक हैराण करणारी घटना घडली आहे. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून एक महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाली होती. मात्र आता अचानक ती फुलांची विक्री करताना सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल अंजना सहिस गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता होत्या. आपले कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून त्या अचानक गायब झाल्या होत्या. मात्र आता उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये फुलांची विक्री करताना दिसून आल्या आहेत. 

महिला कॉन्स्टेबल अंजना सहिस वृंदावनमध्ये फुल विकत असल्याची माहिती मिळताच छत्तीसगड पोलिसांची एक टीम त्यांना घेण्यासाठी आली. मात्र अंजना यांनी त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गेले अनेक महिने पोलीस अंजना यांचा शोध घेत होते. मात्र त्या सापडतच नव्हत्या. त्यांच्या आईने आपली मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर शोध सुरू होता. पण अंजना यांनी मोबाईलचा वापर करणं बंद केल्याने त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. 

महिला कॉन्स्टेबल फुल विकताना दिसली

पोलिसांना अंजना यांनी एका बँकेत एटीएमचा वापर केल्याची माहिती मिळाली. त्यावरूनच तिचं लोकेशन शोधण्यास मदत झाली. अंजनाचा शोध घेण्यासाठी पोलीस वृंदावनमध्ये दाखल झाले तेव्हा महिला कॉन्स्टेबल फुल विकताना दिसल्या. सर्वांना मोठा धक्का बसला. एका कृष्ण मंदिराच्या बाहेर त्या फुलांची विक्री करत होत्या. पोलिसांनी त्यांना घरी येण्यासाठी विनंती केली. पण त्यांनी घरी येण्यास नकार दिला. महिला कॉन्स्टेबलने माझं कुटुंब नसून कोणीही नातेवाईक नसल्याचं म्हटलं आहे. 

नोकरी करताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला ती कंटाळली

मिळालेल्या माहितीनुसार, अंजना सहिस महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. मात्र नोकरी करताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला त्या कंटाळल्या होत्या. याबाबत त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. नोकरीवरून त्यांच्या कुटुंबात देखील वाद होत असत. त्यामुळेच अंजना या सर्व गोष्टींना कंटाळल्या होत्या. वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबीय यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस