शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:08 IST

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमध्ये अजूनही शेकडो न फुटलेल्या जिवंत बॉम्बचा धोका कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : शस्त्रसंधीनंतर लगेच लष्कर आणि पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेले व स्फोट न झालेले अनेक बॉम्ब नष्ट करण्याचे काम झपाट्याने सुरू केले आहे. बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील सहा गावांमध्ये जिवंत बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर तेथील रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमध्ये अजूनही शेकडो न फुटलेल्या जिवंत बॉम्बचा धोका कायम आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमलकोट, मधान, गौहलान, सलामाबाद (बिजहामा), गंगरहिल आणि गवाल्टा या गावांमध्ये सात न फुटलेले बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले. या सहा गावांमधून स्थलांतरित झालेल्या लोकांना आता परतण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पंजाबच्या सीमेजवळ बॉम्ब सापडल्याने खळबळ

शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर सीमेलगतच्या जिल्ह्यांत स्थिती सुधारत असली तरी पंजाबमध्ये मात्र अजूनही तणाव कायम आहे. पाकिस्तान सीमेलगत असलेल्या फाजिल्का जिल्ह्यातील मुठियांवाली गावात रविवारी रात्री उशिरा एक बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती. पंजाबमधील पाच जिल्हे वगळता इतर १८ जिल्ह्यांतील शाळा सोमवारी सुरू करण्यात आल्या आहेत.

रात्र गेली शांततेत

जम्मू विभागातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये काल रात्री शांतता होती. कोणतीही ड्रोन हालचाल, गोळीबार, तोफगोळ्याचा प्रकार आढळून आला नाही. लष्कर व सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, एलओसी व आंतरराष्ट्रीय सीमेवर ‘हाय अलर्ट’ कायम आहे. उरी, कुपवाडा, पूंछ, राजौरी, जम्मू, सांबा, कठुआ आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये घुसखोरी किंवा गोळीबाराची नोंद झाली नाही.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक