शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

आयात केलेला कांदा सडून जाण्याची भीती; दर कमी झाल्याने राज्यांकडून मागणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 06:37 IST

तुर्कस्तान, इजिप्त, अफगाणिस्तानातून ३६ हजार टन कांदा आयात

नवी दिल्ली : देशात कांद्याचे भाव किलोला १५० रुपयांपर्यंत पोहोचल्यावर केंद्र सरकारने तुर्कस्तान, इजिप्त व अफगाणिस्तान या देशांमधून ३६ हजार टन कांदा आयात करण्याची तजवीज केली. परंतु हा परदेशी कांदा प्रत्यक्ष भारतात पोहोचेपर्यंत नवे पिक तयार होऊन देशी कांदाच ५० रुपये किलो या दराने उपलब्ध होऊ लागल्याने आता आयात केलेला कांदा मागणीअभीवी सडून जाण्याची भीती खुद्द केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनीच मंगळवारी येथे व्यक्त केली.

पासवान म्हणाले की, केंद्र सरकारने वाहतूक खर्च स्वत: सोसून आयात केलेला कांदा ५५ रुपये किलो या दराने देण्याची तयारी दर्शविली. परंतु स्थानिक बाजारांत देशी कांद्याचे दर याहून कमी असल्याने आयात केलेला कांदा घ्यायला राज्य सरकारे उत्सुक नाहीत.केंद्र सरकार फक्त आयात करण्याची व्यवस्था करू शकते. पण त्या मालाचे किरकोळ वितरण करण्याची जबाबदारी राज्यांचीआहे.

आता राज्येच कांदा घ्यायला तयार नाहीत, त्याला केंद्र सरकार काय करणार?, असे सांगत मंत्री म्हणाले की, कांदा हा नाशिवंत माल असल्याने तो ठराविक दिवसांत वापरला नाही तर सडून जाईल. मग जनतेचे पैसे वाया घालवले म्हणून काही लोक कोर्टात जातील.स्थानिक कांदा स्वस्त होण्याखेरीज आयात कांद्याची वेगळी चव आणि स्वाद लोकांना पसंत न पडणे हेही आयात कांद्याला उठाव नसण्याचे आणखी एक कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मंत्रालयाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी सांगितले की, परदेशात मागणी नोंदविल्यापैकी १८,५०० टन कांदा आतापर्यंत देशत आला आहे. परंतु आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगण, उत्तर प्रदेश व प. बंगाल यासारख्या काही मोजक्या राज्य सरकारांनी यापैकी जेमतेम दोन हजार टन कांदा आतापर्यंत घेतला आहे. आणखी काही राज्यांनी आधी नोंदविलेली मागणी रद्द केली आहे.श्रीवास्तव पुढे म्हणाले की, देशात मागणी नाही हे पाहिल्यावर ज्याची जहाजे अद्याप रवाना झालेली नाहीत अशा पाच हजार टन कांद्याची परदेशातील मागणी रद्द करण्यात आली आहे. मात्र जी जहाजे आधीच रवाना झाली आहेत त्यातून दोन हजार टन कांदा येत्या दोन दिवसांत व आणखी १४,५०० टन कांदा या महिनाअखेर भारतात पोहोचेल. त्याचे काय करायचे असा सरकारपुढे प्रश्न आहे.

टॅग्स :onionकांदाIndiaभारत