शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वडिलांचे भावनिक आवाहन, पण अतिरेक्यांना फुटला नाही पाझर; 3 मुलांसह 6 जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:55 IST

जिरीबाममधून अपहरण करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील आई-मुलांसह 6 जणांचे मृतदेह नदीत आढळले.

Manipur Violence : गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार वाढला आहे. मागील काही दिवसांपासून अनेक निष्पाप लोकांची निर्घृणपणे हत्या करण्यात येत आहे. अशातच, जिरीबाम येथून बेपत्ता झालेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह नदीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सहा जणांचे जिरीबाम कॅम्प येथून अपहरण करण्यात आले होते. या सहापैकी तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी त्यांचे वडील लैश्राम यांनी अतिरेक्यांना भावनिक आवाहनदेखील केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर काही दिवसांपूर्वी मदत शिबिरातून हे सहाजण अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीय बेपत्ता झाल्यानंतर इंफाळमध्ये तैनात भारतीय राखीव बटालियन (IRB)मधील लैश्राम नाईकजीत यांनी कुटुंबीयांच्या सुटकेसाठी भावनिक आवाहन केले होते. पण, सर्वांचे मृतदेह सापडल्यामुळे त्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बेपत्ता लोकांमध्ये लैश्राम यांची पत्नी, दोन मुले, सासू आणि पत्नीच्या बहिणीचा समावेश आहे. 

'मी खालच्या दर्जाचा सरकारी कर्मचारी आहे'इंफाळमध्ये तैनात भारतीय राखीव बटालियन (IRB) चे लैश्राम नायकजीत यांनी आज तकशी बोलताना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित परतीसाठी भावनिक आवाहन केले आणि ते निर्दोष असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी भारतीय राखीव बटालियनचा शिपाई आहे, इम्फाळमध्ये तैनात होतो. चकमकीदरम्यान पत्नीने मला कॉल केला होता.

रडत रडत तिने सांगितले होते की, काही सशस्त्र अतिरेक्यांनी त्यांना घेरले आहे. यानंतर अचानक कॉल डिस्कनेक्ट झाला. मी फोन केला तेव्हा फोन बंद आला. माझ्या सासूबाईंचा फोनही बंद होता. सुमारे एक तासानंतर, आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीने घरातील सर्वांचे अपहरण झाल्याचे सांगितले. ते सर्व निर्दोष आहेत. माझी दोन मुले अजून बोलूही शकत नाहीत. मोठ्या मुलाचे नुकतेच बोलणे सुरू झाले आहे. कृपया त्यांची सुखरूप सुटका करा, असे आवाहन त्यांनी केले होते. 

दरम्यान, जिरीबामच्या जाकुराधोर आणि बोरोबेकडा भागात झालेल्या चकमकीत 10 दहशतवादी मारले गेले आहेत. या चकमकीनंतर मेईतेई समुदायाचे सहा लोक बेपत्ता आहेत, त्यामुळे परिसरात तणाव वाढला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू