शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वडील, मुलगा आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या, बिहारमध्ये पकडौआ विवाहाचा भयानक शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 13:12 IST

Bihar Crime News: बिहारमधील काही भागात पकडौआ विवाह ही सामान्य बाब बनलेली आहे. मात्र या विवाह प्रकारावरून मोठ्या प्रमाणात वादही होत असतात. दरम्यान, या पकडौआ विवाहातून एक भयानक हत्याकांड घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बिहारमधील काही भागात पकडौआ विवाह ही सामान्य बाब बनलेली आहे. मात्र या विवाह प्रकारावरून मोठ्या प्रमाणात वादही होत असतात. दरम्यान, या पकडौआ विवाहातून एक भयानक हत्याकांड घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारमधील बेगूसराय येथे २५ वर्षीय महिला, तिचे वडील आणि तिच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. महिलेच्या सासरच्या मंडळींनी हे भयानक हत्याकांड घडवले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे पकडौआ विवाहाचे एक प्रकरण असून, त्यामुळेच महिलेच्या सासरचे लोक तिला नांदवत नव्हते, असे गावच्या सरपंचांनी सांगितले. 

 याबाबत समोर येत असलेल्या अधिक माहितीनुसार ही घटना साहेबपूर कमाल ठाणे क्षेत्रातील विष्णूपूर आहुक गावातील आहे. मृतांची ओळख २५ वर्षीय निलू कुमारी, तिचे वडील उमेश यादव आणि भाऊ राजेश यादव यांच्या रूपात पटवण्यात आली आहे. हे सर्व जण बेगूसराय जिल्ह्यातील श्रीनगर परिसरातील रहिवासी होते. 

या घटनेबाबत साहेबपूर कमाल पोलीस ठाण्यातील एसएचओ दीपक कुमार यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. उमेश यादव हे त्यांची मुलगी निलू आणि मुलग्याला घेऊन मुलीच्या सासरी पोहोचले होते. ते सासरी पोहोचले तेव्हा सासरची मंडळी भडकली. तसेच प्रकरण हातघाईवर आले. याचदरम्यान, निलू कुमारीचे सासरे बंदूक घेऊन आले. त्यानंतर त्यांनी या तिघांवरही अगदी जवळून गोळीबार केला. या गोळीबारात सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारmarriageलग्नFamilyपरिवार