शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अपघातात माहेरची २४ माणसं दगावली; तरीही डोळ्यातील अश्रू लपवत बापानं लावलं मुलीचं लग्न  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 12:30 IST

राजस्थानमध्ये एका वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला. ही बस थेट नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देमुलीच्या पाठवणीपर्यंत वडील दुहेरी भूमिकेत पाहायला मिळाले.बुंदीमधील कोटा लालसोट मेगा हायवेवर वऱ्हाडाची बस नदीत कोसळलीनवरीच्या माहेरची २४ माणसं या अपघातात दगावली

माधोपूर - बुधवारी सकाळी माधोपूर कोटा हायवेवर मेज नदीत बस कोसळल्याने २४ लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील प्रवासी माधोपूर येथील रहिवाशी रमेश चंद्र यांच्या मुलीच्या लग्नासाठी जात होते. ही घटना समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पण नवरी आणि तिची आई लग्नाच्या समारंभात पूर्णपणे गुंग होते. लग्नाचे सर्व विधी पूर्ण करताना दिसले. कारण आपल्या कुटुंबातील वऱ्हाडी मंडळीचा अपघात झाल्याची भनकही त्यांना लागली नव्हती.  

जन्म आणि मृत्यू कधीही थांबत नाही असं म्हटलं जातं. बुधवारी सकाळी नीमचौकी येथील रहिवाशी रमेश आणि त्यांचे कुटुंब मुलीच्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त होते. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. संध्याकाळी मॅरिज गार्डन येथे मुलीच लग्न लागणार होतं. रमेश यांची पत्नी दुपारपासून लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीची वाट पाहत होती. नवरीचे मामा-मामी, आजोबा त्याचसोबत कोटाहून येणारे नातेवाईक या सर्वांची वाट पाहिली जात होती. तेव्हा रमेशला फोन आला, मेज नदीमध्ये हायवेवरुन येणारी बस पाण्यात पडली आहे. त्यात प्रवास करणाऱ्या २७ जणांपैकी २४ जणांचा मृत्यू झाला त्यावेळी रमेशला धक्का बसला. 

ज्यावेळी रमेशला ही माहिती समजली तेव्हा तो गार्डनच्या एका बाजूला होता तर कुटुंब हॉलमध्ये लग्नाची तयारी करत होतं. काहीजण नाचत होते तर नवरा-नवरीचे लग्नापूर्वीचे विधी सुरु होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमासाठी रमेशची मुलगी सीमा आणि रमेशची पत्नी बादाम सज्ज झाल्या होत्या. अपघाताच्या बातमी ऐकून रमेश सुन्न अवस्थेत होता. त्याचवेळी आई-मुलगी आणि बाकीचे कुटुंब लग्नाच्या धावपळीत होते. 

या अपघाताची माहिती मिळताच तेथे उभे असलेले उर्वरित नातेवाईक काही वेळातच रमेशकडे आले. दुसरीकडे जयपूरहून वरात निघाली होती. रमेशच्या नातेवाईकांनी त्यावेळी रमेशला धीर देत मुलीचा विवाह संपन्न करण्याचा सल्ला दिला. मात्र ही गोष्ट नवरी आणि तिच्या आईला समजून न देणं आव्हानात्मक होतं. प्रत्येकाने ठरवले की काहीही झाले तरी आई व मुलीला या अपघाताची बातमी मिळणार नाही. चार सुज्ञ आणि जबाबदार लोकांनी या घटनेची माहिती नवरी आणि तिच्या आईपासून लपवण्यासाठी प्रयत्न केले अनेकांना त्यांच्यापर्यंत जाण्यापासून रोखले. 

रमेशने दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, त्यांची पत्नी व मुलगी दुपारी 3 वाजेपर्यंत वारंवार विचारत होते, सकाळी अकरा वाजता येणारं वऱ्हाड अद्याप का आलं नाही? यावर पत्नी बादाम यांची आईची तब्येत वाटेत येताना बिघडली त्यामुळे त्यांना उशीर झाला आहे. वयोवृद्ध आईची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब तिथेच अडकले आहे असं रमेशने सांगितले. दरम्यान, मुलगी व पत्नीचे मोबाइलही त्याच्याकडून घेण्यात आले. यामुळे, ते कोणाशीही थेट संवाद साधू शकले नाहीत.

सकाळी दहा वाजेपासून रमेश आपल्या मुलीच्या पाठवणीपर्यंत दुहेरी भूमिकेत पाहायला मिळाले. जेव्हा ते मुलगी आणि बायकोकडे गेले तेव्हा त्यांचा चेहरा पूर्णपणे आरामदायक आणि आनंदी दिसत होता, परंतु एका कोपऱ्यात आल्यानंतर कोणच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडताना दिसत होते. ज्यावेळी अपघाताची माहिती पत्रकारांना मिळाली त्यानंतर मीडियाचे लोक विवाहस्थळी पोहचले, तेव्हा रमेश यांनी हात जोडून सगळ्यांना इथं कोणाला काही माहित नाही अशी विनंती केली. त्यामुळे कोणीही शूट केलं नाही. संपूर्ण लग्न पार पडल्यानंतर रमेशचा बांध फुटला.  

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्न