शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 08:45 IST

बिहारमध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीला लावलेल्या डीजेला हाय टेंशन वायरचा धक्का बसला, त्यामुळे आठ कावडीयांचा मृत्यू झाला.

बिहारमध्ये आज मोठी दुर्घटना घडली. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी जलाभिषेक करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हाय टेंशन वायरचा धक्का लागला, या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. यावरुन आता विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून एसडीएम आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचताच ग्रामस्थांनी गोंधळ सुरू केला.

वक्फ बोर्ड म्हणजे काय रे भाऊ..., जाणून घ्या अधिकार, मोदी सरकार का आणतंय विधेयक?

मिळालेल्या माहितीनुसार, हाजीपूर औद्योगिक पोलीस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर येथे हा अपघात झाला.  इथे श्रावण महिन्यात गावातील मुलं दर सोमवारी जवळच्या हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करायला जात असतात. रविवारी रात्री मुलं जलाभिषेकासाठी बाहेर पडली होती. या मुलांनी प्रवासासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजेचीही व्यवस्था केली होती. या गावातील रस्ता खराब असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरून जाणाऱ्या हाय टेंशन लाइनला धक्का लागला. विद्युत प्रवाहामुळे ट्रॉलीवर बसलेली मुलांना विजेचा धक्का बसला. यामुळे ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मुळताच पोलीस दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी विद्युत विभागावर गंभीर आरोप केले.  वीज विभागाचा निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून अपघातानंतर सातत्याने माहिती देऊनही वीज विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते.

विद्युत कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही

स्थानिकांनी दिलेली माहिती अशी, ही घटना घडल्यानंतर आम्ही परिसरातील इलेक्ट्रिशियनला फोन केला, पण कोणीही फोन उचलला नाही. आम्ही बोललो तेव्हा तो म्हणाला पोलिसांना सांगा. येथे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघात