शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 08:45 IST

बिहारमध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीला लावलेल्या डीजेला हाय टेंशन वायरचा धक्का बसला, त्यामुळे आठ कावडीयांचा मृत्यू झाला.

बिहारमध्ये आज मोठी दुर्घटना घडली. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी जलाभिषेक करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हाय टेंशन वायरचा धक्का लागला, या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. यावरुन आता विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून एसडीएम आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचताच ग्रामस्थांनी गोंधळ सुरू केला.

वक्फ बोर्ड म्हणजे काय रे भाऊ..., जाणून घ्या अधिकार, मोदी सरकार का आणतंय विधेयक?

मिळालेल्या माहितीनुसार, हाजीपूर औद्योगिक पोलीस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर येथे हा अपघात झाला.  इथे श्रावण महिन्यात गावातील मुलं दर सोमवारी जवळच्या हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करायला जात असतात. रविवारी रात्री मुलं जलाभिषेकासाठी बाहेर पडली होती. या मुलांनी प्रवासासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजेचीही व्यवस्था केली होती. या गावातील रस्ता खराब असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरून जाणाऱ्या हाय टेंशन लाइनला धक्का लागला. विद्युत प्रवाहामुळे ट्रॉलीवर बसलेली मुलांना विजेचा धक्का बसला. यामुळे ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मुळताच पोलीस दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी विद्युत विभागावर गंभीर आरोप केले.  वीज विभागाचा निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून अपघातानंतर सातत्याने माहिती देऊनही वीज विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते.

विद्युत कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही

स्थानिकांनी दिलेली माहिती अशी, ही घटना घडल्यानंतर आम्ही परिसरातील इलेक्ट्रिशियनला फोन केला, पण कोणीही फोन उचलला नाही. आम्ही बोललो तेव्हा तो म्हणाला पोलिसांना सांगा. येथे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघात