शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

23 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीचा खात्मा, 11 तासांनंतर थरारनाट्य संपले, पोलिसांना 10 लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 06:55 IST

मुलीच्या वाढदिवसानिमित्त आसपासच्या लहान मुलांना बोलावून आरोपी त्यांना ओलीस ठेवले होते.

उत्तर प्रदेश : फर्रुखाबादमधील मोहम्मदाबादमध्ये 23 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी  खात्मा केला आला असून मुलांची सुखरूप सुटका केली आहे. या वृत्ताला उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) यांनी दुजोरा दिला आहे. तर, दुसरीकडे, गावातील लोकांनी मारहाण केल्यामुळे आरोपीच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपीच्या तावडीतून 23 मुलांची सुखरूप सुटका करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या टीमला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिली आहे. तसेच, आयजी रेंज कानपूर आणि डीएम व एसपी यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन यशस्वी केले. खात्मा करण्यात आलेल्या आरोपीवर 2001 मध्ये गावातील एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. या हत्येच्या प्रकरणात सध्या त्याची जमीनावर सुटका झाली होती, असे ओ. पी. सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, मुलीच्या वाढदिवसानिमित्त आसपासच्या लहान मुलांना बोलावून आरोपीने त्यांना ओलीस ठेवले होते. सुभाष बाथम असे या आरोपीचे नाव आहे. मोहम्मदाबादमधील करसिया गावामध्ये आरोपी सुभाष बाथम याचे घर आहे. गुरुवारी मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावातील लहान मुलांना त्याने आपल्या घरी बोलावले होते. सगळी मुले दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी दाखल झाली. त्यानंतर आरोपी सुभाषने घराचा दरवाजा बंद केला. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचे तिला कळाले. तिने तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आवाहन केल्यानंतरदेखील सुभाषने कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्याने पोलिसांवर  दरवाज्याच्या मागून बॉम्बफेक करुन गोळीबारही केला. यामध्ये एक ग्रामस्थ जखमी झाला आहे. तसेच, त्याने बॉम्बफेक केल्याने एक भिंत कोसळली. त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. 

पोलिसांनी या घराभोवती वेढा घातला होता. मात्र, सायंकाळपर्यंत पोलिसांना मुलांची सुटका करण्यात अपयश आले. यानंतर ओलीस ठेवलेल्या मुलांची आणि महिलांची सुटका करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला बोलावण्यात आल्याची माहिती कानपूर मंडळाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली होती. तसेच, राज्य सरकारकडून एनएसजी कमांडोची मागणी करण्यात आली. मात्र, 11 तासानंतर आरोपी सुभाषचा खात्मा करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले आणि मुलांची सुटका करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश