शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
"केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
4
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
5
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
6
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
7
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
8
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
10
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
11
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
12
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
15
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
16
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
17
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
18
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
19
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
20
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत

Kisan Kranti Padyatra: सरकारची आश्वासनं नामंजूर; शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 6:28 PM

आज रात्रभर शेतकरी दिल्लीच्या सीमेवरच थांबणार

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीच्या सीमेवर पोहोचलेल्या किसान क्रांती पदयात्रेनं उग्र रुप धारण केलं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप या प्रयत्नांना यश आलेलं नाही. दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. मात्र यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांना दिलं. मात्र यावरुन शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच राहणार आहे. आज रात्रभर हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर थांबणार आहेत. सरकारनं दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना मंजूर नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. याशिवाय अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या. यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांचा एक गट हिंसक झाल्यानं काही पोलीस जखमी झाले. त्यामुळे सौम्य लाठीमार करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं. उग्र होत असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत आणि उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र यातून अद्याप मार्ग निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल सरकार सकारात्मक असून याबद्दल विचार केला जाईल, असं आश्वासन शेखावत आणि राणा यांनी सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना दिलं. मात्र यानंतरही शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच राहील, असं भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी सांगितलं. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीFarmerशेतकरी